"वर्ग:संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
शरद पोर्णिमा - माता शबरी जन्मतिथी
ओळ १:
[[Category:समाज]]
शरद पोर्णिमा - माता शबरी जन्मतिथी
 
आज कोजागिरी पोर्णिमा ! आजच्या दिवशी कोऽजार्गति? कोऽजार्गति? म्हणजे कोण जागे आहे ?, कोण जागृत त आहे? असे विचारीत दुर्गा देवी सर्वत्र फिरते असे म्हणतात. नवरात्राचे नऊ दिवस शक्ति बुध्दिच्या दैवताचे आराधान करावे. विजया दशमीला विजय संपादनासाठी सीमोल्लंघन करावे. त्यानंतर येणारी ही पोर्णिमा ! शेतीची कामे अर्ध्यावर झालेली, शेतातील पिके वाऱ्यावर डोलू लागलेली, चार महिन्यांचा पावसाळा संपत आलेला. काही भागात नवीन पिके हाताशी आलेली आहेत. अनेक भागातील ही नवात्र पोर्णिमा!
 
अशा या संपन्नतेमध्ये शरद पोर्णिमेला शबरीचा जन्म झाला. शबरी कोण होती? कोणी म्हणजे ती शबर राजाची कन्या होती. कोणी तिच्या वनवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात. कोणाला मातंग ऋषींसमोर अध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरू उपदेश घेणारी शबरी भावते. तर कोणाला आपल्ल्या दैवताला जे आहे ते, प्रसंगी उष्टी बोरे देऊनही समर्पित होणारी बशरी आठवते. कोणाला सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम लक्ष्मणांना मार्गदर्शन करणारी शबरी आठवते. किती विविध रूपे ! सगळीच अनुकरणीय आणि म्हणूनच आदर्शवत रूपे !!
 
ती शबर राजाची कन्या होती. राजाची कन्या म्हणून लाडा कोडात वाढली. तिला सर्व संपन्नता लाभली. राजकन्या म्हणून विद्या, शिक्षण ही झाले. ज्या शिक्षणाने तिला तिचे ध्येय आध्यात्मिक मार्गावर नेण्यासाठी, दृढ राखण्यासाठी उपयुक्त झाले.
 
वनवासी भिल्ल समाज वनात राहणारा निसर्गप्रेमी आणि निसर्गाची काळजी वाहणारा. पुढील आयुष्यात शबरी वनात राहिली. गुरू मातंगांच्या आश्रयाला गेली. तिच्याही हातून वनवासी भागाचाच उध्दार झाला. आजही भिल्ल समाज रामाबरोबर तिचे नाम घेत निसर्गप्रेम अनुभवत आहे. निसर्गाची काळजी घेत आहे.
 
राजकन्या म्हणून जन्माला आली. मोठी झाली. तरी गुरु उपदेश घ्यावा, शिष्यत्व पत्करावे ही समर्पण वृत्ती दिसते. गुरू करणे, शिष्यत्व घेणे याचा अर्थ आपले स्वत:चे सर्व विसरून जाणे. कष्टमय जीवन जगायचं. जगरहाटीपासून दूर वनात रहायचे. गुरू घरी रहायचे. अशा पध्दतीत राजकन्या शबरीने ऋषी मातंगांना गुरू बनविले आणि त्यांच्या उपदेशानुसार रामाची वाट पहता ती वनवासात राहिली.
 
रामायणात शबरी कथा काय आहे ? वाट पहात असलेल्ल्या शबरीला भेटण्यासाठी राम लक्ष्मण शबरीच्या झोपडीत येतात आणि पाय धुवून, रानफुले देऊन शबरी त्यांना उष्टी बोरे खायला देते. तिचे प्रेम राम सहज स्विकारतात. उष्टी बोरे दिल्ल्याचा व रामाने ती खाल्याचा लक्ष्मणाला राग येतो. राम त्याची समजूत काढून त्यालाही उष्टी बोरे खायला सांगतात. त्यानंतर शबरी योग सामर्थ्याने नश्वर देहाचा त्याग करून आत्म्याला परमात्म्यात विलीन करते, ही कथा आहे.
 
उष्टी बोरे यावर आपले संत मुरारी बापू यांनी मार्मिकपणे खूप उहापोह केला आहे. वर्षानुवर्षे शबरी वनात रहात होती. तिेिच फिरत होती. त्यामुळे वनातील झाडं आणि झाड तिच्या परिचयाचे आहे. ती स्वत: फळे आणि कंदमुळे खाते व पाणी पिऊन राहते म्हणजे निसर्ग आहारच झाला. वर्षानुवर्षे बोरे खात असल्ल्याने त्यातील चांगली कोणती ? त्याचे बी काढून वेगळे ठेवणे, पावसाळयापूर्वी त्याचीच लागवड करणे, त्याला खतपाणी घालून त्याची देखभाल करणे हे सर्व शबरीने केले आहे. अशा तऱ्हेने जास्तीत जास्त मधुर व मोठी बोरे निर्माण करण्याचे कार्य ही तिने केले आहे. अशी बोरे तिने श्री रामांना दिली. आपल्या दैवताला जे द्यायचे ते उत्तम असले पाहिजे. त्यातील हिणकसपणा आपण काढून टाकला पाहिजे हाच संदेश उष्टी बोरातून जातो. आणि म्हणूनच अनेकांना उष्टी बोरे देणारी शबरी भावते.
 
शबरी राम भेटीमध्ये जो संवाद झाला त्या राम लक्ष्मण यांचे सीता शोधार्थ वनातून हिंडणे शबरी ऐकते. लंकापती रावणाने, राक्षसाने सीतेला पळवून नेले आहे व श्रीराम दक्षिण दिशेला जाणार आहेत. हे सर्व जाणून घेतल्यावर शबरी श्री रामांना दक्षिण दिशेला असलेल्ल्या हनुमान, बाली, सुग्रीव इ. ची मदत घेण्याच सुचविते. त्यांचे बलाढय सैन्या सहाय्यार्थ घेण्याची सुचनाही शबरी करते. त्यामुळे सीता शोध सुकर होईलच त्याचबरोबर रामाकडुन असुर, राक्षसी, अधर्मी शक्तिचा नाश होईल हा विश्वास ती श्री रामांना देते. हा दिशासंकेत श्री रामांना शबरीकडुन मिळतो आणि त्या संकेताचे पालन श्री राम करतात. त्यातूनच पुढे रावणाचा म्हणजे असूर शक्तिचा नाश होतो व रामराज्य निर्माण होते.
 
दिशा संकेत करणारी शबरी ही आजच्या काळातही आपली सर्वांची आदर्श व्हावी असे वाटते आणि म्हणूनच शबरी कुंभाचे आयोजन करीत आहोत.
 
कुंभ म्हणजे काय ? श्री क्षेत्राच्या ठिकाणी होणार कुंभ आपल्ल्याला माहीत आहे. काही जण कुंभाला जाऊन ही आले असतील. भक्तीभाव व पुण्यसंचय करण्यासाठी कुंभाला जाऊन येणे येवढा सीमित अर्थ आपण जाणतो.
 
जेव्हा जेव्हा सामाजिक नियमांमध्ये परिवर्तनाची आवश्यकता वाटली त्यावेळी कुंभाचे आयोजन समाजधुरीण, साधु संत आदिंनी मिळून केले. अशा कुंभाला नियमीतपणा असावा म्हणुन दर 12 वर्षांनी, दर 6 वर्षांनी कुंभाचे आयोजन. या कुंभामध्ये समाजातील सर्व स्तरातले सर्व भागातले लोक तसेच सर्वत्र संचार करणार साधु संत उपस्थित असतात. कुंभाची पर्वणी साधणे हा भाग आहेच तसेच धर्मचर्चा होणे त्यात काही निर्णय होणे, झालेला निर्णय सर्व समाजापर्यंत पोचणे हे सुलभ होते.
 
शबरी कुंभ का ? शबरीला सर्वमान्यता आहे. पंपा सरोवर, राम लक्ष्मण भेट, उष्टी बोरे व सीता शोधार्थ दिशा संकेत हे सर्व विषय सर्व ठिकाणी उल्लेखिले जातात. भारतातील विभिन्न प्रदेशात शबरी आमची होती असे सर्वजण म्हणतात. याचा अर्थ शबरी सर्वांना पूजनीय आहे. शिवाय असूरी शक्तिंविरूध्दचा लढा रामाने लढावा व त्याचा नायनाट करावा अशी शबरीची इच्छा आहे. म्हणूनच ती दिशासंकेतही करते. असुरी अधर्मी शक्तिविरूध्द लढण्याचा तिचा दिशासंकेत आजही लागू होणारा आहे.
 
आजची परिस्थिती काय आहे ? वनवासी समाजाच्या विकासाआड अनेक लोक, शक्ति कार्यरत आहेत. आणि म्हणूनच कुंभाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या लोकांना हाच दिशासंकेत द्यावा ही वनवासी हे हिंदू आहेत. हिंदू समाजाचे अंग आहे. जे कोणी वनवासी समाजावर, जीवनावर आघात करतील त्याचा नि:पात करण्यासाठी वनवासी समाजाने पुढे यावे, संघठीतपणे त्याला विरोध करावा व त्याचे परिपत्य करावे. नगरवासी, वनवासी, ग्रामवासी सर्वांनी सावध रहावे व धर्म परिवर्तन करणाऱ्या मायावी, विदेशी देशद्रोही, विध्वंसक शक्तिला नेस्तनाबूत करावे. ह्याचा धर्मनिर्णय करण्यासाठी शबरी कुंभ आहे.
 
आज शरद पोर्णिमेला शबरी मातेची जन्मतिथी साजरी करतांना आपण काय ठरविणार आहोत ? शबरी मातेच्या दर्शनाला, या कुंभामध्ये मी अवश्य जाईन. अनेकांना बरोबर घेऊन जाईन. तसेच धर्माविरूध्द वागणाऱ्या, धर्मपरिवर्तन करणाऱ्या लोकांच्या कारवायांना मी प्रतिबंध करेन व आपल्या धर्मात परत येणाऱ्या लोकांना आपलेसे करून सामावून घेईल, अशी प्रतिज्ञाच आज आपण घेऊ या. दुर्गामातेला ही आम्ही जागृत आहोत हा प्रतिसाद यातूनच दिला जाईल.
राम लक्ष्मण शबरी की जय बोलो मातंग की ।
शबरी माता की जय