"इसाक मुजावर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो added Category:मराठी लेखक using HotCat |
No edit summary |
||
ओळ १:
हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीचा माहितीकोश समजले जाणारे इसाक मुजावर (जन्म : इ.स. १९३४; मृत्यू : मुंबई, २६ फ़ेब्रुवारी, २०१५) हे एक मराठी लेखक
सिनेपत्रकार म्हणून फिल्म इंडिया मासिकाचे संपादक [[बाबूराव पटेल]] यांनी १९४० च्या दरम्यान चित्रपटावर प्रकाश टाकला. त्यांचा बराच दबदबा होता; परंतु मराठी आणि हिंदी चित्रपटांनी खरी गती घेतली ती १९५०-६० या काळातच. या काळात आलेले चित्रपट पाहिलेली पिढी आज सुवर्णक्षण आठवत दिवस कंठीत आहे. इसाक मुजावर यांचे मामा, भालजी पेंढारकर यांच्याकडे तबलावादक म्हणून काम करीत होते. वडिलांचे निधन झाल्यावर इसाक यांचे शिक्षण मामांकडेच झाले. त्यांची आई शिक्षिका होती. जेमतेम १०वीपर्यंत शालेय शिक्षण घेतल्यानंतर इसाक यांनी फिल्मी दुनियेत मामासोबत वावरत असतानाच १९४६ ला ‘तारका’ या चित्रपटविषयक मासिकात आपल्या लिखाणाचा श्रीगणेशा केला. स्वातंत्र्यापूर्वी दोन वर्षे त्यांचा त्या 'तारका' सिनेसाप्ताहिकात राज कपूरच्या
कोल्हापूर येथे त्या काळी प्रकाशित होणार्या ‘लोकशक्ती’मध्ये इसाक मुजावर यांनी लिखाण केले. तसेच चित्रपटविषयक काही लिखाण त्यंनी मुक्त पत्रकार म्हणून अनेक ठिकाणी केले. गावकरी दैनिकातर्फे १९५८ मध्ये ‘रसरंग’ या साप्ताहिकाची सुरुवात झाली. यामध्ये चित्रपट, रंगभूमी, क्रीडा असा तिहेरी मसाला होता. ९ जानेवारी १९५९ रोजी इसाक मुजावर यांची निवासी संपादक म्हणून तेथे नेमणूक झाली. त्यावेळेपासून हा पत्रकार आपली लेखणी घेऊन चौफेर मुशाफिरी करतो आहे. रसरंग या साप्ताहिकाने अल्पावधीत गती घेतली होती. नाशिक येथूनच ‘रसरंग’चा कारभार चालत असल्यामुळे इसाक मुजावर यांना नाशिक येथेच म्हणजे दादासाहेब फाळके यांच्या गावीच यावे लागले. त्यांच्याशी बोलताना एखाद्या विषयावर त्यांना विचारल्यावर संपूर्ण इतिहास ते आपल्यासमोर ठेवतात. पडद्यावर काय चित्रित झाले आहे, यावर त्यांचा भर असायचा. रुपेरी पडद्यामागे चालत असलेल्या भानगडीवर त्यांनी कधीच प्रकाश टाकला नाही किंवा चटपटीत लिखाण केले नाही. इसाक यांनी ‘गॉसिप’ पत्रकारिता कधीच केली नाही. फ्लॅशबॅक हे त्यांचे सदर जुन्या कलावंतांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे होते. त्याच काळात त्यांनी सवाल-जवाब, यादे, हमारी याद आयेगी अशी नवी स्तंभलेखनाची मालिकाच सुरू केली.
ओळ १०:
जुन्या पिढीसोबत नाळ जुळल्यांतर आलेल्या नव्या कलावंतासोबत देखील त्यांनी तशीच मैत्री केली. ‘रसरंग’मध्ये काम करीत असताना त्यांनी केलेल्या लिखाणाच्या मालिका रसिकांनी आवडीने वाचल्या आहेत. १९५९ ते १९७८ या आपल्या २० वर्षांच्या कालावधीत ‘रसरंग’ला त्यांनी दर्जा मिळवून दिला होता. १९७८ नंतर मात्र त्यांनी ‘रसरंग’चा निरोप घेतला व मुंबईत ‘चित्रानंद’ नावाचे नवे साप्ताहिक सुरू केले. ‘चित्रानंद’चा गाडा त्यांनी १९८७ पर्यंत पेलला. त्यानंतर हे साप्ताहिक बंद झाले. त्यानंतर इसाक मुजावर यांनी ‘माधुरी’, ‘जी’ या साप्ताहिकांत लिखाण केले. ‘चित्रानंद’चे सर्वच दिवाळी अंक वाचनीय असायचे.
अनेक वृत्तपत्रांत त्यांनी लेखन केले. [[भालजी पेंढारकर]], [[व्ही. शांताराम]], [[अनंत माने]] यांच्यापासून [[सचिन]], [[अशोक सराफ]], [[लक्ष्मीकांत बेर्डे]], [[जब्बार पटेल]], [[चंद्रकांत कुलकर्णी]], [[राजा परांजपे]] अशा असंख्य माणसांशी त्यांनी मैत्री केली आणि त्या मैत्रीतून
चित्रसृष्टीतील आपल्या प्रवासामधील अनुभवांचे यथार्थ चित्रण त्यांनी 'मराठी चित्रपटांचा इतिहास'च्या लिखाणात केले आहे. सखोल माहिती असलेले हे लिखाण आहे.
ओळ ४५:
* सिनेरंग
* सिल्व्हर स्क्रीन
* स्क्रीन प्ले
ओळ ५४:
[[वर्ग:चित्रपट]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९३४ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. २०१५ मधील मृत्यू]]
|