"पाणिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sachinvenga (चर्चा | योगदान) छो added Category:संस्कृत साहित्यिक using HotCat |
Sachinvenga (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ५:
पाणिनीच्या सूत्रांत वैदिक भाषेस ' छन्दसि' व लौकिक भाषेस(लोकांमध्ये रूढ असलेली रूढ बोलीभाषा) 'इतिभाषायाम्' असे म्हटलेले आहे. म्हणजे पाणिनीच्या वेळेस संस्कृत भाषा लोकांच्या बोलण्यात होती. पाणिनीनंतर ती फक्त पंडिताच्या बोलण्यात शिल्लक राहिली असावी असे मानले जाते.
जगातला सर्वात समर्थ व्याकरणकार म्हणून पाणिनी प्रसिद्ध आहे. त्याने त्या काळच्या संस्कृत वाङ्मयाला व्याकरणाने बांधले आणि म्हणूनच पुढे संस्कृतात सुसंबद्ध रचना तयार झाल्या असे इतिहास सांगतो. योगसूत्राचे रचनाकार पतंजलीने हे पाणिनीचे ऋण मान्य केले आहे. हे व्याकरण तयार करायचे ठरल्यावर ते एका खोलीत बसून करता येणार नाही त्यासाठी जनतेत जावे लागेल ही जाणीव पाणिनीला प्रथम झाली. गावांमधून, आश्रमांमधून मंत्रिपरिषदेच्या बैठकांतून, सैनिक, व्यापारी आणि श्रमिक यांच्या बोलीभाषेतून असंख्य शब्द, वाक्प्रचार, म्हणी पाणिनीने गोळा केल्या. तसेच शेती, निरनिराळे खेळ, नृत्य, अर्थव्यवहार, चालीरीती या आणि अशा अनेक गोष्टींमधून त्याने शब्दांचा ढीग आधी रचला आणि मग त्यातून ते जोडून वापरण्याच्या ज्या प्रचलित पद्धती होत्या त्यांना नियमांत बांधले. हे नियम पाणिनीने आठ प्रकरणे असलेल्या ’अष्टाध्यायी’ नावाच्या ग्रंथात एकत्र केले. जगातल्या सर्वच भाषाकारांनी पाणिनीचे हे अद्वितीयत्व मान्य केले आहे.
|