"सत्य युग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ १:
[[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील पहिला भाग म्हणजे [[कृत युग]] किंवा '''सत्य युग'''.
== युगाची कल्पना ==
वैश्विक संदर्भात [[काळ]] हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसर्या कल्पनेत चौदा [[मन्वंतर|मन्वंतरे]] येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरूष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदापैकी सातव्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे [[सत्य युग|कृत]], [[त्रेता युग|त्रेता]], [[द्वापर युग|द्वापर]] आणि [[कलि युग|कली]]. या युगांत अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० लाख वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलियुगात आहोत आणि या युगाचा प्रारंभ [[इ.स.पू. ३१०२]] मध्ये झाला असे मानले जाते.<ref>
|