"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) |
Pushkar Pande (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १८:
==सामंतशाहीतील समाज==
सामंतशाही समाजात तीन [[वर्ग]] अस्तित्वात होते. पहिला वर्ग सामंत व जमिनदारांचा होता. हा वर्ग सर्वांत प्रभावशाली होता. तो सत्ता व वैभव भोगणारा होता. दुसरा वर्ग [[नगर]]वस्तीत राहणारा मध्यमवर्ग होता. तिसरा वर्ग शेतकऱ्यांचा व शेतमजुरांचा (भूदास) होता. तिसरा वर्ग प्रत्यक्षात जमीन कसण्याचे काम करत होता. या वर्गातील लोक गुलामांप्रमाणे आणि वेठबिगारांप्रमाणे वागवले जात होते. तिसऱ्य वर्गाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. सर्व सामान्य जनतेची दुरावस्था हा सामंतशाहीचा मोठा दोष होता.
==मॅनॅार==
प्रत्येक सामंताची तटबंदीयुक्त [[गढी]] आणि त्या सभोवतालचा प्रदेश म्हणजे [[मॅनॅार]] होय. मॅनॅारमध्ये सामंताचा प्रासाद, शेतकऱ्यांच्या झोपड्या, [[चर्च]], [[धान्य]]ाची कोठारे आणि त्यांना लागून शेतजमीन असे. संपूर्ण मॅनॅारभोवती तटबंदी असे. मॅनॅारला मध्ययुगीन समाजात महत्त्वाचे स्थान होते. प्रत्येच मॅनॅार हे आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होते. [[किल्ला|किल्लेवजा]] मॅनॅारमधील सामंत एखाद्या [[राजा]]प्रमाणे राहत. ते आपल्या प्रासादात दरबार भरवत. या दरबारात त्यांचे दुय्यम सामंत व कुळे हजर रहात असत. ते नजराने देत व मनुश्यबण पुरवत. मॅनॅारमध्ये नेहमी उत्सव व समारंभ चालत. खेळांचे सामने व मेजवान्या चालत. प्रत्येक मॅनॅार आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आणि प्रशासकीय दृष्ट्या स्वायत्त होते. मॅनॅारमुळे युरोपीय सामंतशाही अधिक भळकट झाली.
==सामंतशाहीची भारतीय संकल्पना==
|