"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) No edit summary |
Pushkar Pande (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ ९:
रोमन सम्राट शार्लमेन नंतर सत्तेवर आलेले बहुतेक राजे दुर्बल व अकार्यक्षम होते. त्यांचे शासनावर काहीही नियंत्रण नव्हते. राजांचे स्वत:चे सैन्य नसल्यामुळे संरक्षणासाठी त्यांना सामंतांवर अवलंबून राहावे लागे. यामुळे मध्यवर्ती शासन आणखी परावलंबी झाले. प्रत्येक सामंताजवळ स्वत:चे सैन्य असल्यामुळे त्यांचे प्राबल्य वाढत गेले. सामंतांचे सैन्य व त्यांची कुळे राजा एेवजी सामंतांशी एकनिष्ठ असत. त्यामुळे मध्यवर्ती शासनाची दुर्बळता आणखी वाढत गेली. त्यामुळे सामंत आणि त्यांचे सैन्य कमकुवत मध्यवर्ती शासनावर हुकुमत गाजवू लागले. यातून सामंतशाही उदयास आली.
==सामंतशाहीचे स्वरूप==
शेतजमिनीवरील मालकी हक्क हा सामंतशाहीचा केंद्रबिंदू होता. राजा हा राज्यातील जमिनीचा मूळ मालक होता. साम्राज्यातील जमीन कसण्यासाठी राजा ती सामंतांमध्ये वाटून देत असे. वरिष्ठ सामंत यांना मिळालेल्या जमिनी कनिष्ठ सामंतांना वटत होते. कनिष्ठ सामंत आपल्या जमिनी कुळांना देत असत. कुळांना सामंतांचे संरक्षण मिळे.
|