"रामदासी मठ, परळी वैजनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: परळी वैजनाथ येथील रामदासी मठ - महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्य...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ४:
मठाचा, तेथील परंपरा, हस्तलिखित ग्रंथ यांचा परिचय .
 
परळी वैजनाथ येथील रामदासी मठ - - - बस स्टँड किंवा त्या जवळच असलेल्या रेल्वे स्टेशन पासुन दीड किमी.अंतरावर टाॅवरच्या नंतर गणेश पार चे श्री गणपती मंदिर आहे. त्या जवळच गोराराम मंदिर नावाने ओळखला जाणारा हा परळी वैजनाथ येथील मठ आहे. विद्यमान मठपती श्री रामदास बुवा रामदासी या मठाची परंपरा पुढील प्रमाणे आहे.
श्री आप्पा स्वामी,-. श्री जयराम बुवा, श्री गंगाराम बुवा, श्री नागोबुवा, श्री लक्ष्मण बुवा, श्री माणकेश्वर बुवा, त्यांचे बंधु श्री परशुराम बुवा, श्री कल्याण बुवा (नि.मार्गशीर्ष शुद्ध 2, शके 1891), श्री. नागनाथ बुवा ( नि.आषाढ शुद्ध 5, शके 1886) , विद्यमान मठपती श्री रामदास बुवा रामदासी. मठाचे मूळ पुरुष श्री आप्पा स्वामी हे परभणी जिल्ह्य़ातील गंगाखेड तालुक्यातील गोदावरी काठच्या सुपं किंवा सुपे या गावचे राहणारे होते. श्री आप्पा स्वामी व त्यांचे सात भाऊ या गावात राहात होते.
मठाचे आद्य पुरूष श्री आप्पा स्वामी हे त्यांच्या गावी जहागीरदारी व वतनदारी सांभाळत होते. एक साधु त्या गावी आले. त्यांना आपली आध्यात्मिक विद्या या आठ मुलांना द्यायची होती.पण ती घेण्यास ज्यानी नकार दिला ते त्या साधूच्या शापाने निर्वंश झाले. एकट्या श्री आप्पा स्वामी यांनी ती विद्या स्विकारली. त्या ठिकाणी श्री रामाची स्थापना केली. तेथेच असलेल्या लिंबाच्या झाडाला रोज रामाच्या पूजेचे तीर्थ घातले तर तुझा वंश वाढेल हा आशीर्वाद दिला. दरम्यान प.पू.श्री.वासुदेवानंद स्वामी महाराज तेथे आले. एक लोखंडी कांब त्या लिंबाला त्यांनी ठोकली. तेंव्हा पासून त्या झाडाला अर्ध्या भागात गोड पाने होती. पुरामुळे आज ते झाड नाही पण तेथे एक ब्रम्ह राक्षसाची शिळा आहे. त्या राम मंदिराची पूजा आजही तेथे वंश परंपरेने श्री सदाशिवराव जोशी हे करीत आहेत. या श्री आप्पा स्वामी यांना श्री समर्थ रामदास स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यानंतरचे श्री जयराम बुवा हे गाव सोडून परळी वैजनाथ येथे स्थायिक झाले.
श्री समर्थांनी परळी वैजनाथ येथील मठात श्री हनुमानाची स्थापना केली. भक्तीला शक्तीची जोड दिली.
श्री समर्थांनी परळी वैजनाथ येथील मठात श्री हनुमानाची स्थापना केली. भक्तीला शक्तीची जोड दिली. स्वरूपसांप्रदाय अयोध्या मठ | जानकी देवी श्री रघुनाथ दैवत | मारूती उपासना नेमस्त | वाढविला परमार्थ रामदासी || शके 1594 मध्ये ही शाडूची हनुमानाची तळहाता एवढी मूर्ती स्थापन करून श्री समर्थ निघून गेले. आजही मठात गेल्यावर डावीकडे ही मूर्ती दृष्टीस पडते. श्री जयराम बुवा हे रामदासी पद्धतीने राहून भिक्षामिसे लहान थोर परिक्षून सोडत होते. श्री राम उपासना वाढत गेली व शिष्य संप्रदाय मठाशी जोडला जाऊ लागला. श्री समर्थ दर्शनासाठी श्री जयराम बुवा यांची तळमळ व तीव्रता वाढत गेली. श्री जयराम बुवा श्री समर्थांकडे जाऊन पोहोचले. श्री जयराम बुवा हे गाव सोडून परळी वैजनाथ येथे स्थायिक झाले. श्री जयराम बुवा यांच्या काळात श्री समर्थ रामदास स्वामी तेथे आले होते. आमची प्रतीक्षा ऐसी | कांही न मागावे शिष्यासी | आपणामागे भगवंतासी | भजत जावे || |
स्वरूपसांप्रदाय अयोध्या मठ | जानकी देवी श्री रघुनाथ दैवत | मारूती उपासना नेमस्त | वाढविला परमार्थ रामदासी ||
श्री जयराम बुवा हे अयोध्येला जाऊन मूर्ती घेऊन परळी वैजनाथला परतही आले. इकडे श्री समर्थांच्या जीवनात अनेक घटना घडत गेल्या. त्यांच्या मोठ्या बंधूंचे श्रेष्ठ श्री गंगाधर स्वामी यांचे फाल्गुन वद्य 13/14, शके 1599 या दिवशी निर्याण झाले. नंतर श्री संत वेणाबाई यांनी चैत्र वद्य 14 सह अमावस्या, शके 1600 या दिवशी श्री समर्थ चरणी आपला देह अर्पण करून धन्यता मिळविली. पुढे चैत्र शुद्ध पौर्णिमेला शके 1602 (सन 1680) या हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि जाणते राजे श्री शिवछत्रपती महाराज यांच्याही निर्याणाची बातमी श्री समर्थांच्या कानी आली. या सर्वांचा परिणाम म्हणून श्री समर्थ कमालीचे अंतर्मुख झाले. आणि शिष्यांना पूर्व कल्पना देऊन माघ वद्य 9, शके 1603 या दिवशी श्री समर्थ रामदास स्वामी यांचे निर्याण झाले. सर्व मठातून ही बातमी वा-यासारखी पसरली. इकडे परळी वैजनाथ मठात श्री जयराम बुवा श्री राम मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसाठी वाटच पहात होते. अचानक श्री समर्थांच्या प्रेरणेने योगीराज श्री कल्याण स्वामी यांचे परळी वैजनाथ येथील मठात आगमन झाले. सर्वांनी मोठ्या जल्लोषात जय घोष केला " जय जय रघुवीर समर्थ ".
 
श्री समर्थांनी परळी वैजनाथ येथील मठात श्री हनुमानाची स्थापना केली. भक्तीला शक्तीची जोड दिली. स्वरूपसांप्रदाय अयोध्या मठ | जानकी देवी श्री रघुनाथ दैवत | मारूती उपासना नेमस्त | वाढविला परमार्थ रामदासी || शके 1594 मध्ये ही शाडूची हनुमानाची तळहाता एवढी मूर्ती स्थापन करून श्री समर्थ निघून गेले. आजही मठात गेल्यावर डावीकडे ही मूर्ती दृष्टीस पडते. श्री जयराम बुवा हे रामदासी पद्धतीने राहून भिक्षामिसे लहान थोर परिक्षून सोडत होते. श्री राम उपासना वाढत गेली व शिष्य संप्रदाय मठाशी जोडला जाऊ लागला. श्री समर्थ दर्शनासाठी श्री जयराम बुवा यांची तळमळ व तीव्रता वाढत गेली. श्री जयराम बुवा श्री समर्थांकडे जाऊन पोहोचले. श्री जयराम बुवा हे गाव सोडून परळी वैजनाथ येथे स्थायिक झाले. श्री जयराम बुवा यांच्या काळात श्री समर्थ रामदास स्वामी तेथे आले होते. आमची प्रतीक्षा ऐसी | कांही न मागावे शिष्यासी | आपणामागे भगवंतासी | भजत जावे || |
 
आमची प्रतीक्षा ऐसी | कांही न मागावे शिष्यासी | आपणामागे भगवंतासी | भजत जावे ||परळी वैजनाथ मठाचे मठपती श्री जयराम बुवा यांनी श्री समर्थांचे सज्जन गडावर जाऊन दर्शन घेतले. "आपण मठात हनुमंताची स्थापना केली, आता श्री रामरायाची स्थापना आपल्या हस्तेच व्हावी " अशी मनिषा श्री जयराम बुवांनी समर्थांजवळ व्यक्त केली. समर्थांनी श्री जयराम बुवांना एक तलवार भेट दिली. आज्ञा केली की श्री अयोध्येला जाऊन श्री राममूर्ती घेऊन या. मुसलमानी अत्याचार सुरूच आहेत. कुठे दगा फटका झाला च तर ही तलवार तुझ्या रक्षणासाठी बरोबर ठेव. श्री रामरायाच्या मूर्ती स्थापनेचे पुढे पाहू. श्री समर्थांची आज्ञा घेऊन श्री जयराम बुवा परळी वैजनाथ येथे आले. शुभ दिवस व मुहूर्त पाहून श्री क्षेत्र अयोध्येला जाण्यास रवाना झाले.
श्री काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. श्री राम, श्री लक्ष्मण आणि श्री सीतामाईंच्या सुंदर मूर्ती घेऊन श्री जयराम बुवा नामस्मरणाच्या अनुसंधानात परळी वैजनाथ येथे मठात केंव्हा पोहोचले हे त्यांचे त्यांना देखील कळले नाही. माऊलींच्या हरिपाठातील 28 व्या अभंगात म्हटल्याप्रमाणे "हरि तया सांभाळी अंतर्बाह्य "या अर्थाने सद्गुरु कृपेने श्री जयराम बुवा हे परत आले. येताच श्री समर्थांना मूर्ती आणल्याचा निरोप दिला. आता सर्व जण श्री समर्थांच्या येण्याची प्रतिक्षा करीत होते.
श्री जयराम बुवा हे अयोध्येला जाऊन मूर्ती घेऊन परळी वैजनाथला परतही आले. इकडे श्री समर्थांच्या जीवनात अनेक घटना घडत गेल्या. त्यांच्या मोठ्या बंधूंचे श्रेष्ठ श्री गंगाधर स्वामी यांचे फाल्गुन वद्य 13/14, शके 1599 या दिवशी निर्याण झाले. नंतर श्री संत वेणाबाई यांनी चैत्र वद्य 14 सह अमावस्या, शके 1600 या दिवशी श्री समर्थ चरणी आपला देह अर्पण करून धन्यता मिळविली. पुढे चैत्र शुद्ध पौर्णिमेला शके 1602 (सन 1680) या हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि जाणते राजे श्री शिवछत्रपती महाराज यांच्याही निर्याणाची बातमी श्री समर्थांच्या कानी आली. या सर्वांचा परिणाम म्हणून श्री समर्थ कमालीचे अंतर्मुख झाले. आणि शिष्यांना पूर्व कल्पना देऊन माघ वद्य 9, शके 1603 या दिवशी श्री समर्थ रामदास स्वामी यांचे निर्याण झाले. सर्व मठातून ही बातमी वा-यासारखी पसरली. इकडे परळी वैजनाथ मठात श्री जयराम बुवा श्री राम मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसाठी वाटच पहात होते. अचानक श्री समर्थांच्या प्रेरणेने योगीराज श्री कल्याण स्वामी यांचे परळी वैजनाथ येथील मठात आगमन झाले. सर्वांनी मोठ्या जल्लोषात जय घोष केला " जय जय रघुवीर समर्थ ".
श्री. समर्थांनी श्री जयराम बुवा यांना सांगितले होते की मूर्ती स्थापनेसाठी मी कल्याणास पाठवितो. या वचनाप्रमाणें श्री समर्थांच्या निर्याणानंतर आज योगीराज श्री कल्याण स्वामी महाराज यांच्या मठातील आगमनाने सर्व रामदासी मंडळी व परळी वैजनाथ येथील नागरिकांना आनंद झाला. गुढय़ा तोरणे उभारून सर्वांनी आपला आनंद व्यक्त केला. शके 1604 मधील एका शुभदिनी परळी वैजनाथ येथील रामदासी मठात श्री समर्थांनी स्थापन केलेल्या मारुती रायापुढे मंत्रघोषात श्री. कल्याण स्वामींच्या हस्ते अयोध्येहून आणलेल्या श्री राम, श्री सीतामाई व श्री लक्ष्मण यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. हा विधी शके 1604 मध्ये झाला पण ती तिथी मात्र नक्की सांगता येत नाही व तशी नोंद ही मठातील जुन्या कागदपत्रात नाही असे विद्यमान मठपती श्री रामदास बुवा रामदासी सांगतात.