इंग्रज सरकार शंभुधन फुगलोंसांना पकडण्याचा प्रयत्न करीत होते. परंतूपरंतु त्यांनी आपल्या कचार जातीच्या [[आदिवासी]] सहकार्यांच्या साहाय्याने इंग्रजांशी छापामार युद्ध सुरू ठेवले होते. ते भूमीगत राहून इंग्रजाविरोधात जनतेला चेतवित होते. [[मेजर वायड]]ने शंभूधनना एका खेड्यात गाठले. तुंबळ युद्ध झाले. शंभुधनने मेजर वायडचा खातमा केला. इंग्रज अधिकार्यानी कूटनीतीचा अवलंब करून शंभुधनांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण एका गद्दाराने इंग्रजांना शंभुधनाचा ठावठिकाणा दिला. मोठी सेना घेवून इंग्रज अधिकारी [[मेजर विल्यम]]ने शंभुधनला घेरले. घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात शंभुधनजी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार वेळेवर न झाल्याने त्यांची शारिरीक स्थिती अधिकच बिघडली. शेवटी १२ [[जानेवारी]], इ.स. १८८३ रोजी शंभुधन फुंगलोसा याचा मृत्युमृत्यू झाला.