"शेतकरी कामगार पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छो Wikipedia python library v.2
ओळ ५:
महाराष्ट्रामध्ये पक्षाचे ४ विधानसभा सदस्य, १ विधान परिषद सदस्य आहेत. तसेच रायगड जिल्हा परिषद तसेच पेण, पनवेल, अलिबाग, सांगोला पंचायत समितीवर शेकापची सत्ता आहे. रायगडसह इतर ५ जिल्हा परिषदांमध्ये(नांदेड, सोलापूर, नाशिक, परभणी, नागपूर ) पक्षाचे सदस्य निवडून आले आहेत.अलिबाग, काटोल,बिलोली, इत्यादी नगरपरिषद शेकापच्या वर्चस्वाखाली आहेत तसेच खोपोली, पनवेल मध्ये पक्षाचे नगरसेवक आहेत.
शेकापच्या जन्माची पाश्वभूमी...
1946 च्या सप्टेंबर महिन्याच्या काळात शंकरराव कॉंग्रेसकाँग्रेस अंतर्गत कार्य करणा-या सहका-यांना मोरे यांनी आपली खंत बोलून दाखविली. ते म्हणाले, “कॉंग्रेस“काँग्रेस पक्षाने जनतेला वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांना आणि निवडणूक जाहिरनाम्यातील बचतांना हरताळ फासलेला आहे. कॉंग्रेसकाँग्रेस सरकार हे भांडवल दारांचे हीत पाहणारे आणि शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन करण्याच्या घोषणेच्या विरोधात काम पाहत आहे. यामुळे आपणास वेगळा मार्ग निवडावा लागेल.” उपरोक्त संत व्यक्त केल्यानंतर प्रत्यक्षात 11-09-1946 रोजी शंकरराव मोरे यांनी त्यांचे सहकारी भाऊसाहेब राऊत, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, रामभाऊ नलावडे व इतर काही आमदारांच्या मदतीने ‘शेतकरी -कामकारी संघ’ स्थापन केला. सदर ‘शेतकरी-कामकारी संघ’ स्थापनेनंतर कॉंग्रेसमधीलकाँग्रेसमधील मोरे यांच्या विरोधकांनी टिकास्थ सोडले. त्यावेळेस ‘नवयुग’ सारख्या साप्ताहिकांमधून शंकरराव मोरे यांनी आपल्या लेखणीने त्यांना चोख उत्तर दिले. यानंतर दिनांक 11-01-1947 रोजी फणसवाडी येथील शंकररावजी मोरे यांच्या बंगल्यात पुनश्र्च एकदा कॉंग्रेसकाँग्रेस शेतकरी-कामकरी संघाची बैठक बोलावण्यास आली होती. सदर बैठकीत महाराष्ट्राचे उदगाते यशवंतराव चव्हाण यांनी प्रथम “शेतकरी-कामकरी पक्ष” स्थापनेस प्रखर विरोध केला होता.या विरोधाने खचून न जाता पूण्यात भाऊसाहेब शिरोळे यांच्या घरी केशवराव जेधे, औटे, मोहीते, आनंदराव चव्हाण, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, भापकर, भाऊसाहेब शिरोळे यांना एकत्रित करून शंकररावजी मोरे यांनी ‘शेतकरी-कामकरी’ ऐवजी नवा ‘शेतकरी-कामगार पक्ष’ स्थापन करण्याचा मुहूर्त नारळ फोडला. परिणामे 3 ऑगस्ट 1947 रोजी आळंदी मुक्कामी शंकररावजी मोरे यांनी निवडक कार्यकर्त्यांना बोलावून ऐतिहासिक बैठक घेतली. याच बैठकित आजचा ‘शेतकरी कामगार पक्ष’ महाराष्ट्रात जन्मास आला.
 
'''शेतकरी कामगार पक्षांचे प्रारंभी कार्ये'''
1947 काळात शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेचे कार्य म्हणजे शंकरराव मोरे यांच्या कर्तबगारीचा कळस होता. या पक्षाला प्रारंभापासूनच शास्त्रीय समाजसत्तावादाची वैचारिक बैठक देऊन शंकरराव मोरेंनी ग्रामीण महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना या पक्षाच्या झेंड्याखाली खेचून आणले. शंकररावांच्या सार्वजनिक जिवनातील तिस-या व सर्वात तेजस्वी कालखंडाला शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासूनच सुरूवात झाली. शेतकरी कामगार पक्षाची धोरणे सर्वांना समजावी म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक भक्कम करण्यासाठी अनेक अभ्यास वर्गातून व शिबिरातून शंकररावांनी बौध्दिक वर्ग घेतले. महाराष्ट्रात शंकररावांनी तुफानी दौरे काढुन भांडवलदारांच्या व त्यांचे मुनीम बनलेल्या कॉंग्रेसकाँग्रेस सरकारच्या विरुध्द उभ्या महाराष्ट्रात जबरदस्त रान उठवून राज्यकर्त्यांच्या सिंहासनाला धाम फोडला. शंकररावांनी त्यांच्या ‘जनसत्ता’ ह्या साप्ताहिकांतून मार्क्सवाद आणि शेतकरी कामगार पक्षाचे एकसुत्री विचार लोकांसमोर मांडले. यावेळी ‘शेकाप’ हा जातीयवादी पक्ष असल्याचा कॉंग्रेसकाँग्रेस कडून आरोप करण्यात येत होता. वर्गविग्रहाच्या तत्वांवर अतूट निष्ठा असलेला शेतकरी कामगार पक्ष लोकांच्या पसंदीस जस-जसा खरा उतरत गेला तस-तसे कॉंग्रेसवाल्यांचेकाँग्रेसवाल्यांचे आरोप धांदात खोटे ठरु लागले.पक्षस्थापनेच्या निवेदनातच स्पष्ट ठरले होते की, “यापूढे स्पष्टपणे समाजवादी तत्वानुसार कामगार शेतक-यांच्या वर्ग संघटना उभारणे व त्यांचे दैनंदिन वर्गलढे लढविणे हाच एक मार्ग आहे.” त्यामुळे ‘शेकाप’ हा जातीयवादी पक्ष म्हणणा-याची तोंडे आपोआपच बंद होत असत.त्याचप्रमाणे 3 ऑगस्ट 1947 ह्या पक्ष स्थापनेच्या बैठकित झालेल्या ठरावात देखील असे ठरले होते की, “प्रखर लढ्याशिवाय किसान कामगारांचे राज्य स्थापन करता येत नाही. कोणताही पक्ष वर्ग संघटनांचे पाठबळ घेतल्याशिवाय सत्तारुढ झाला, तरीही तो पक्ष किसान कामगारांचे राज्य स्थापन करु शकणार नाही.” त्याचवेळेस असे देखील म्हटले होते की, “या वर्गसंघटना केवळ आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अस्तित्वात न आणता त्या सामाजिक व आर्थिक क्रांतीच्या आधारस्तंभ बनल्या पाहीजेत. शेतकरी कामगार पक्षाचे हेच प्रमुख धोरण संस्थापक शंकरराव मोरे यांनी आखले होते. आजही शेतकरी कामगार पक्ष याच धोरणावर कार्यरत आहे'
 
'''‘शेकाप’च्या जन्माची बीजे'''
शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक शंकरराव मोरे यांनी शेकापच्या जन्माची बीजे कशी रुजवली गेली याचे विवेचन उदबोधकरित्या केले आहे.शंकरराव मोरे विवेचनात म्हणतात, “मार्क्सवादी तत्वज्ञान आणि कामगार वर्गाचे आंतरराष्ट्रीयत्व ही स्वातंत्रलढ्याला पोषक आहेत; परंतू या देशात कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने धोरणविषयक चूका करुन मार्क्सवादाचे विकृत स्वरुप भारतीय जनतेपुढे ठेवले, हे श्रमजीवी जनतेचे दुर्दैव्य म्हटले पाहिजे. कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या सातव्या कॉंग्रेसमध्येकाँग्रेसमध्ये (1935) वासाहातिक देशातील स्वातंत्र्यलढ्यासंबंधी मार्गदर्शन करण्याचे कार्य डिमिट्राव्ह प्रबंधाने केले. हिंदूस्थानातील कम्युनिस्टांनी स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसजनांसहकाँग्रेसजनांसह भाग घेतला पाहीजे असे धोरण जाहीर करुन देखील येथील कम्युनिस्टांनी 1930 व 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही. त्यामुळे भारतीय जनतेचा मोठा रोष कम्युनिस्टांना पत्कारावा लागला होता. तसेच या लढ्यातून कामगार वर्गीय पुढारीपणाही तो प्रस्थापित करु शकला नाही. त्यामुळे हिंदूस्थानात स्वातंत्र्यलढ्याचे कम्युनिस्ट शत्रु आहेत ही भावना जोपासली गेली. याउलट कम्युनिस्टांनी स्वातंत्र्यलढ्यात पुढारपण घेतले आसते तर 1947 साली तडजोड करण्याची ताकद कॉंग्रेसच्याकाँग्रेसच्या भांडवलदारी पुढारीपणाच्या हाती राहीली नसती. परंतू कम्युनिस्टांच्या चुकांमुळेच देशातील कामगार-किसान हा कॉंग्रेसच्याकाँग्रेसच्या मागे गेला. ब्रिटीश साम्राज्याशी हातमिळवणी करणे कॉंग्रेसलाकाँग्रेसला त्याचमुळे सोपे झाले. सदर घटनेस विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्रात कामगार–किसान क्रांती जिवंत ठेवण्यासाठीच मला ‘शेतकरी-कामगार पक्षाची’ निर्मिती करावी लागली” असेही शंकरराव मोरे यांनी ठामपणे सांगितले.
 
'''‘शेकाप’चा सुवर्णकाळ'''
1948 ते 1956 हा ‘शेतकरी-कामगार पक्षाचा’ सुवर्णकाळ होता म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण याचकाळात शंकरराव मोरे यांचे झुंजार नेतृत्व या पक्षास लाभले होते. शंकररावांनी श्रमजीवी जनतेला समजेल अश्या सोप्या भाषेत हजारो खेड्यात नेण्याचे व जनतेला कॉंग्रेसच्याकाँग्रेसच्या भांडवलदारी पुढारीपणा खालून काढून मार्क्सवादी छीवणीत आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आपल्या सिध्दहस्त लेखणीने व जुगलबंद वक्तृत्वाने पार पाडले. आजही मार्क्सवाद व लालबावटा खेड्या-पाड्यात दिसून येत आहे ते ‘शेकाप’ मुळे होय. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ही शेकाप अग्रेसर होता. 1952 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे 28 आमदार निवडुन गेले होते तर शंकरराव मोरे व इतर लोकसभेमध्ये निवडून गेले होते. यामुळेच शेतकरी कामगार पक्षाचा हा सुवर्णकाळ होता. दुर्दैवाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीस ऐन भर आला असतानाच शेकाप फुटली आणि पक्षाची वाताहात सुरू झाली. परंतू पक्षाची ध्येधोरणे इतकी मजबुत आहेत की, शंकररावांचे शिष्य व मानसपूत्र एन. डी. पाटील यांनी त्यानंतर शेकापची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आज केवळ रायगड जिल्ह्यात आपले आस्तित्व टिकवून धरणा-या शेतकरी कामगार पक्षाचा महानेरू आमदार विवेक पाटलांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेललाय.
 
'''‘शेकाप’चा विक्रम'''