आर्य सप्तसिंधूच्यासप्त[[सिंधू]]च्या सुपीक परिसरात राहात होते. तेव्हा सुरवातीच्या काळात [[पशुपालन]] हा त्यांचा मुख्य [[व्यवसाय]] होता. तोच त्यांच्या आर्थिक जीवनाचा पाया होता. आर्य [[गंगा]]-यमुनाच्या[[यमुना]]च्या खोर्यात पोहोचले तेव्हा [[शेती]] हा त्यांचा प्रमुख व्यवसाय झाला. [[गहू]], [[सातू]], [[जव]], [[ऊस]], [[कापूस]], [[मोहरी]], फळभाज्या[[फळ]]भाज्या यांचे उत्पादन आर्य घेत असत. शेतीबरोबरच पशुपालन हा पूरक व्यवसाय केला जाई. गायींचा वापर विनीमयाचे साधन म्हणून केला जाई. विनिमयाच्या साधनात '''निष्क''' या नाण्याचा वापरही केला जाई. त्याकाळी गायींच्या संख्येवरून कुटुंबाची आर्थिक स्थिती ठरवली जाई. [[शेतकरी]] आपल्या उत्पन्नाचा सहावा भाग राजाला [[कर]] म्हणून देत असत.