[[चैत्र शुद्ध नवमी]] हा हिंदू पंचागातीलपंचागानुसार चैत्रातीलचैत्त्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या [[श्रीराम|रामाचा]] जन्म झाला. हा दिवस '''रामनवमी''' म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या चित्रास वा [[मूर्ती|मूर्तीस]] इतर [[हार|हारांसमवेतच]] [[गाठी]]पण घालतात. रामाची पूजा करताना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून [[प्रसाद]] वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजऱ्यासाजर्या केल्या जाणाऱ्याजाणार्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.
रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रम ही केले जातात. श्रीराम ही सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.
रामनवमी
गुढीपाडव्याच्या नऊ दिवसानंतर म्हणजेच चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगातील चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस येतो. याच दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. या दिवसाला रामनवमी म्हणून साजरी करतात. या दिवशी दुपारी १२ वाजता रामजन्माचा सोहळा साजरा करतात. या दिवशी रामजन्माचा पाळना पण गायल्या जातो. श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अन् लाडक दैवत. जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या र्निदालनासाठी, भगवान महाविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार. रामनवमी म्हणजेच राम जन्माच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, किर्तन, प्रवचन इ. कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इ. कार्यक्रम ही केले जातात. श्रीराम ही सर्व अबाल वृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.
रामनवमीचे व्रत कसे करावे
व्रत सुरु करण्यापूर्वी एक दिवस (अष्टमीस) अगोदर पहाटे स्नान संध्या आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे
चैत्र शुक्ल नवमीला ब्रम्ह मुहुर्तास उठून घर स्वच्छ करावे घरामध्ये गोमुत्र शिंपडून घर पवित्र करावे
दारास कोवळ्या आंब्यांच्या पानांची तोरणे लावावीत. दारासमोर समोरचे अंगण रांगोळीने सुशोभित करावे
'उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे||' या मंत्राद्वारे व्रत संकल्पना करावी व संपूर्ण आठ प्रहर उपास धरावा
त्यानंतर, 'मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये' हा संकल्प करून काम- क्रोध-लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे
घराच्या नैतृत्य भागात मंडप टाकून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलशाची स्थापना करावी
कलशावर राम, सीता भरत, शत्रुध्न, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्तींची किंवा चित्रांची प्रतिष्ठापना करावी
त्यानंतर विधी पूर्वक संपूर्ण पुजा करावी
दिवसभर रामायणाचा पाठ करावा तसेच होम हवन करून उत्सव साजरा करावा
दशमीला पारायण करून व्रत सोडावे
रामनवमी व्रताचे फळ
* हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्यभर केले तर आयुष्य आनंदमय होते.
* एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते.
* विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते.
|