"व्यंकटेश दिगंबर माडगूळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ३१:
'''व्यंकटेश दिगंबर माडगूळकर''' ([[जुलै ६]], [[इ.स. १९२७|१९२७]] - [[ऑगस्ट २८]], [[इ.स. २००१|२००१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[लेखक]] आणि [[चित्रकार]] होते. त्यांनी कथा, कादंबर्यांसोबत [[चित्रपट|चित्रपटांसाठी]] पटकथाही लिहिल्या.
ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळ दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२) आणि सत्तांतर (१९८२) ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. बनगरवाडीतून व्यंकटेश माडगूळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. रुढ अर्थाने ह्या कादंबरीला कथानक नाही. बनगरवाडी नावाच्या ह्या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण तीत केलेले आहे. तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी, तेथील कंगालपणा, दुष्काळ, तेथील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत; तेथील रहिवाशांच्या जीवनांतील चढउतार ह्यांना जिवंत शब्दरूप तेथे लाभले आहे. येथे कोणी विशिष्ट व्यक्ती नायक वा नायिका नाही, तर बनगरवाडी ह्या गावालाच नायकत्व देण्यात आलेले आहे. इंग्रजी व डॅनिश ह्या भाषांतून ही कादंबरी अनुवादिली गेली आहे. (इंग्रजी–द व्हिलेज हॅड नो वॉल्स –डॅनिश–Landsbyen). वावटळ, करुणाष्टक आणि कोवळे दिवस ह्या त्यांच्या कादंबऱ्या आत्मचरित्रपर आहेत. गांधीवधानंतर झालेल्या भीषण दंगली, लुटालूट आणि जाळपोळ ह्यांनी ब्राह्मण समाजावर झालेल्या आघाताची वावळट ही कहाणी होय. विड्स ऑफ फायर ह्या नावाने तिचे इंग्रजी भाषांतर झाले आहे. करुणाष्टकात दारिद्य्राने ग्रासलेली आठ मुलांची दुःखी आई त्यांनी उभी केली. व्यंकटेश माडगूळकर हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले होते. कोवळे दिवस ह्या कादंबरीत अशाच एका कोवळ्या स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत. पुढचं पाऊल ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय, त्याबद्दलची त्याची चीड आणि पुढंच पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग चोखळण्याची दलित मनाची धडपड दाखविली आहे. सत्तांतर मध्ये आरंभापासून अखेरपर्यंत वानरांच्या टोळ्यांचे सूक्ष्म आणि मार्मिक चित्रण आहे. प्रत्येक टोळीचे जंगलातील क्षेत्र, टोळ्यांची परस्परांच्या हद्दीत चालणारी घूसखोरी, त्यांचे संघर्ष; नरानरांतले, माद्या माद्यांतले सर्व वानरांची जंगलातील हिंस्त्र प्राण्यांपासून आणि शिकाऱ्यांपासून स्वतःच्या टोळीचा बचाव करण्याची धडपड, टोळीचे नायकत्व आणि टोळीतील माद्या मिळविण्यासाठी वानरांना कराव्या लागणाऱ्या हाणामाऱ्या ह्यांचे विलक्षण परिणामकारक दर्शन ह्या छोट्याशा कादंबरीत आहे. सत्तांतर म्हणजे टोळीचा एक नायक जाऊन तेथे दुसरा नायक येणे. हे कसे घडते, हे ह्या कादंबरीचे कथानक होय. तथापि वानरांच्या ह्या कथेतून मानवी जगातील वृत्तिप्रवृत्तींचीही प्रतीकात्मक पातळीवर प्रत्यय येत राहतो. ‘काळाप्रमाणे संघर्षही सतत वाहतच असतो... जेव्हा एखादी जात धोक्यात येते, बाहेरूक परकं कुणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो ..... संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्रं माहीतच नसतात, ते सुळे, नखं वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो’ ही कादंबरीतली काही वाक्ये फार अर्थपूर्ण आहेत.
|