"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? |
||
}}
'''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ''' सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात राष्ट्रीय स्वयंसेवक या संस्थेची स्थापना करण्यात आली. [[इ. स. १९९०]] च्या दशकापर्यंत या संस्थेने आपल्या विचारसरणीच्या प्रसारासाठी अनेक शाळा, धर्मार्थ संस्था आणि क्लब स्थापन केले होते.<ref>Atkins, Stephen E. (2004). Encyclopedia of modern worldwide extremists and extremist groups. Greenwood Publishing Group. p. 264. ISBN 978-0-313-32485-7. Retrieved 31 Oct. 2012. Link [http://books.google.co.in/books?id=b8k4rEPvq_8C&pg=PA264&hl=en#v=onepage&q&f=false]</ref>नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या संस्थेचे स्वयंसेवक खूप मदत करतात. राष्ट्रीय पातळीवरच्या पदांवर प्रचारक निवडणूक पद्धतीने निवडून येतात.<ref>http://books.google.com.au/books/about/K_S_Sudarshan.html?id=IBZyXwAACAAJ&redir_esc=y</ref>
==स्थापना==
[[File:Dr. Hedgevar.jpg|thumb|right|150px|डॉo केशव बळीरामपंत हेडगेवार]]
संघटनेचा मूळ उद्देश संघटित सांस्कृतिक राष्ट्रवाद असला तरी संघटनेच्या निर्मितीमागे, इतिहास काळात हिंदूधर्मीयात संघटनात्मकतेचा अभाव असल्याबद्दलचे कारण, मुख्यत्वे मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनरींकडून झालेल्या/करविल्या गेलेलं [[धर्मांतर]], पुरोगामी आणि वैश्वीकरणामुळे येणाऱ्या पाश्चात्य जीवनशैलीच्या विघातक प्रभावांबद्दल नकार आणि संशयवाद, स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीवादाच्या जहालवादास नकार, अल्पसंख्याकांचे काँग्रेस/महात्मा गांधी यांच्याकडून होणारे नको तेवढे लाड आणि यांचा लोकानुनय ही प्रमुख कारणे होती.
==कार्यतत्त्व ==
भारताला आपली [[मातृभूमी]] मानणारे हे सगळे [[हिंदू]] आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत [[अखंड भारत|अखंड भारताची]] निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे. .<ref>[http://www.rss.org/knowus/] </ref>
===राजकीय विचार===
संघाच्या शाखेला स्वतःचा [[वाद्यवृंद]] असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचलन होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.
===प्रचारक===
पूर्णवेळ संघकार्य करणाऱ्या आणि राष्ट्रीयत्वाचा प्रचार करणार्यांना [[प्रचारक]] म्हणतात. देशहितासाठी घरदार सोडून संघाची कामे करणारे आज अनेक प्रचारक आहेत. प्रत्येक प्रचाराकाकडे वेगळी जबाबदारी असते. अनेक जण आजीवन [[प्रचारक]] देखील असतात.<ref>http://books.google.com.au/books/about/The_RSS_Story.html?id=s0RAAAAAMAAJ&redir_esc=y</ref> राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व पदांवर हेच प्रचारक निवडणूक पद्धतीने निवडून येतात.<ref>http://books.google.com.au/books/about/K_S_Sudarshan.html?id=IBZyXwAACAAJ&redir_esc=y</ref> सरसंघचालकाचे पद हे नियुक्तीने भरले जाते. जुने सरसंघचालकच आपला उत्तराधिकारी निवडतात. सरसंघचालकांची निवड ही लोकशाही मार्गाने होत नसली तरी बाकी सर्व पदे ही लोकशाही मार्गाने निवडली जातात. सरसंघचालक हे केवळ मार्गदर्शन करू शकतात. निर्णय हे [[लोकशाही]] पद्धतीने आणि सरकार्यवाह यांच्या नेतृवाखाली होतात.
===शिस्त===
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाखाणण्यासारखी [[शिस्त]] असते. संघाचे कार्यक्रम ठरलेल्या वेळी सुरू होतात आणि ठरलेल्या वेळीच संपतात.
[[इ.स. १९४८]] मध्ये संघावर [[गांधीहत्या प्रकरण|गांधीहत्या प्रकरणामुळे]] बंदी घालण्यात आली होती.. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींवर]] हल्ला करणारा [[नथुराम गोडसे]] हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले. जुलै १९४९ मध्ये ही बंदी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी घातलेल्या अटी संघाने मान्य केल्यानंतर उठविण्यात आली. या अटी अशा होत्या : रा. स्व. संघ लिखित व प्रकाशित घटना स्वीकारेल, आपले कार्यविधी सांस्कृतिक क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवेल व राजकारणात पडणार नाही, हिंसा व गोपनीयतेचा त्याग करेल, भारतीय ध्वज व संविधानाप्रती निष्ठा बाळगेल आणि लोकशाही पद्धतीने संघटनेची बांधणी करेल. <ref>इंडिया सिन्स इंडिपेंडंस, लेखक बिपन चंद्रा व इतर, पेंग्विन बुक्स, बारावे पुनर्मुद्रण पृष्ठ क्र. १०१, ISBN 9780143104094</ref>
===संघ समर्थक===
काही टीकाकार संघाच्या विचारसरणीवर हिंदू हुकूमशाही म्हणून टीका करतात. तर संघाच्या समर्थकांची मुख्य मागणी सरकारने अल्पसंख्यकांचे लाड थांबवावेत अशी आहे उदाहरणार्थ:
* हिंदू मंदिरे सरकारच्या ताब्यात पण मशिदींवर आणि चर्चवर कोणतीही बंधने नाहीत,
* [[शाह बानो खटला|शाह बानो खटल्याची]] गैरहाताळणी,
* कोणत्याही भारतीय नागरिकाला [[काश्मिर|काश्मीरमध्ये]] वसण्याला बंदी करणारे घटनेतील [[३७०वे कलम]],
* सर्वधर्मीयांसाठी समान नागरी कायदा न आणणे,
* [[हाज यात्रा|हज यात्रेला]] दिलेली अवाजवी सूट आणि
* मुस्लिम मतदार दुखावतील म्हणून लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम न चालवणे इत्यादी गोष्टींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आक्षेप आहे.
संघाची ऐतिहासिक भूमिका अशी आहे की हिंदूंवर त्यांच्याच भूमीवर अन्याय होत आला आहे आणि संघ केवळ हिंदूंच्या नैसर्गिक हक्कांची मागणी करत आहे. टीकाकार म्हणतात की संघ भारताचा निधर्मवादी पाया बदलू पाहतो आहे. या गोष्टीशी बाबरी मशिदीचा मुद्दा संबंधित होता.
==संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था==
*[[भारतीय जनसंघ]]
*[[विश्व हिंदू परिषद]]
*[[वनवासी कल्याण आश्रम]]
==आजवरचे सरसंघचालक==
* [[केशव बळीराम हेडगेवार|डॉ. केशव बळीराम हेडगेवार]]
|