|आंबवली हे मंडणगड तालुक्यातील भारजा नदीच्या किनारी वसलेलं एक गाव. गावाची भौगोलिक परिस्तिथी उत्तम आहे . कोकणातील या गावामध्ये सगळे सण साजरे होतात . (शिमगा, गणपती उत्सव, दिवाळी , नवरात्रोत्सव) मोठ्या उत्साहाने साजरा होतो. येथील मुख्य पिक तांदूळ (भात) , पूर्वी मका कणसं, नाचणी, तुरी, जोंधळे, हरिक, तीळ यांची लागवड व्हायची. कालांतराने त्यामध्ये बदल होत गेला. सध्या भातशेती केली जाते. सोबत दुबार पिक म्हणून कडवे , चवळीची लागवळ होते.
कुल्वाडी (कुणबी) जातीचे हे शेतकरी सध्या शेतीकडे दुर्लक्ष्य करत आहेत त्याची खंत वाटते.
पर्यटनासाठी येथे सुंदर असा समुद्र किनारा आहे, पावसाळ्यात येथे अनेक सुंदर निसर्गदृश्य पहावयास मिळतात. गावच्या जवळ असलेल्या केळशी येथे पर्यटनासाठी अनेक लोक येतात. भावी वर्षामध्ये आंबवली हे एक सुद्धा गाव पर्यटन स्थळ होऊ शकत.
गावाची ग्रामदेवता महामैदेवी आहे. तिची पालखी शिमाग्यामध्ये निघते. संकटामध्ये गावासाठी धावून येणाऱ्या ह्या मातेवर गाववाल्यांचा विश्वास आहे. नौरात्रोत्सात्वात देवीचे घट बसतात अन या दिवसामध्ये देवीची मनोभावे पूजा केली जाते.
अमर शक्ती क्रिकेट संघ या नावाने गावातील संघ क्रिकेट स्पर्धा खेळतात. या संघाला जुनी परंपरा आहे इतिहास आहे. दरवर्षी गावात क्रिकेटच्या स्पर्धा होतात. सगळेजण हिरीहीरीने भाग घेतात.
राजकीय सत्तेबद्दल बोलायचं झालं तर जी राजकीय पार्टी गावाचं काम करते त्यांनाच पाठींबा दिला जातो. एकंदर आंबवली हे गाव एकजूट असल्याने राजकीय नेते गावाकडे आकर्षित होतात.
गावामध्ये जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. शाळेला सुद्धा मोठी परंपरा / इतिहास आहे. गेल्याच काही वर्षापूर्वी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला. त्याचे श्रेय जाते त्या शाळेसाठी मुलांसाठी झटणाऱ्या शिक्षकांना. आजवर अनेक शिक्षक होऊन गेले त्या सगळ्याचा त्यामध्ये सहभाग आहे. तसेच विद्याधन शिक्षण संस्थेने आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण सूरु करून त्यामध्ये भर घातली आहे. अनेक मुले मुंबई तसेच इतर ठिकाणी शिक्षण घेतात. शिक्षण पूर्ण करून चांगल्या कंपन्यामध्ये कामाला आहेत.
गावामध्ये पुढाऱ्यांची संख्या खूप आहे त्यांच्या शांत विचारू वृत्तीमुळेच आज आंबवली हे गाव एकजूट आहे.