"गोविंदप्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो गोविंद प्रभूपान गोविंदप्रभू कडे J स्थानांतरीत
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ ३:
== गोविंदप्रभू चरित्रलीळा ==
{{बदल}}
ज्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातून [[लीळाचरित्र]] हे चक्रधरस्वामींचे चरित्र प्रकटले आहे, त्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातूनच श्री प्रभूंचे चरित्रही अवतरले आहे. या ग्रंथाचे नाव आहे ऋद्धिपूरलीळा किंवा श्री गोविंदप्रभू चरित्र लीळा. या ग्रंथात त्यांच्याविषयीच्या अनेक लीळांत 'राऊळ वेडे : राऊळ पिके' असा उल्लेख आला आहे. सांप्रदायिक मान्यतेनुसार त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती. त्यांच्याविषयीचे जे प्रसंग या चरित्रग्रंथात वर्णिले आहेत, त्यांच्यांमधून त्यांच्या माहात्म्याच्या खुणा जाणवल्याशिवाय राहत नाहीत {{संदर्भ हवा}}. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले {{संदर्भ हवा}}. परोपकार हा त्यांचा स्थायिभाव होता {{संदर्भ हवा}}. ऋद्धिपूरलीळेतील दोन-तृतीयांशांहून अधिक लीळांतून गोविंद प्रभूंची परोपकारी वृत्ती प्रकटते. त्यांच्या कार्यातून समाजाच्या सर्व घटकांतील लोकांच्या कल्याणाची कामनाच दिसून येते.<ref>{{स्रोत संकेतस्थळ| दुवा = http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=vJdZwQfLlNRo8MtAtFnWvTe6WZQpD4RhQ0ncIfr1|qXeZ72qKNigwQ== | शीर्षक = श्री गोविंद प्रभू {{मृत दुवा}}| लेखक = डॉ. यू.म. पठाण | दिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २००९ | भाषा = मराठी | अ‍ॅक्सेसदिनांक = १४ एप्रिल, इ.स. २०११}}</ref>
==स्त्री आणि शूद्रादींचा उपासनेत सहभाग आणि प्रबोधन==
स्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच भक्ती व उपासना रून आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिले. त्यांच्या स्त्री-शिष्यांना 'श्री प्रभू राऊळ माए : राऊळ बापो' असे वाटे. या लीळांमध्ये त्यांच्या कार्याविषयी अनेक प्रसंग वर्णिले आहेत. उदाहरणार्थ, एका निराधार गर्भवती स्त्रीच्या घरी जाऊन ते ती स्त्री मोकळी होईपर्यंत तिची सेवा करतात. एका गावावर हल्ला होतो, तेव्हा ते दोन्ही सैन्यांमध्ये उभे राहून दोन्ही गावांत समेट घडवितात. 'मातंगा विनवणी स्वीकारु' यासारख्या लीळेत ते स्पृश्यास्पृश्य भेद कसा पाळीत नाहीत, याचे वर्णन केलं आहे. त्या गावाच्या विहिरीवर अन्यवर्णीय दलितांना पाणी भरू देत नाहीत. "आम्ही पाणीयेवीण मरत असो", अशी काकुळती ते लोक करतात, तेव्हा गोविंद प्रभू त्यांच्यासाठी विहीर खणायला लावतात. यादवकालीन समाजातील अन्यायमूलक रूढींवर प्रहार करून ते सर्व समाजघटकांत समभाव व सौहार्द निर्माण करतात. {{संदर्भ हवा}}.