"रघुनाथ जगन्नाथ सामंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
रघुवीर सामंतांचे वडील जगन्नाथ सामंत सबजज्ज होते. वाई, भिवंडी, डहाणू, कल्याण, धुळे, पुणे, ठाणे याठीकाणी नोकरी करुन शेवटी ते ठाणे येथे स्थायिक झाले. मुलगा रघुवीर याला शिक्षणासाठी त्यांनी वसतिगृहात ठेवले होते.
 
इ.स. १९३३ साली सामंतांनी 'पारिजात प्रकाशन' सुरु केले. त्यांची तीन वर्षांची मुलगी ज्योती अकाली निधन पावल्यामुळे तिच्या स्मृत्यर्थ सामंतांनी इ.स. १९४३ साली 'अमरज्योति वाङमय' ही प्रकाशनसंस्था सुरु केली. बालवाङमय प्रसिद्ध करण्याकडे त्यांचा अधिक कल होता. दोन्ही प्रकाशनसंस्थांतर्फे कथा, शब्दचित्रे, लघुनिबंध, गाणी, सांघिक अभिनयगीते, नाट्यात्मक कादंबरी, ग्रामीण जीवनावरील कादंबरी, नाटक, विद्यार्थ्यांसाठी माहितीपर छोटी पुस्तके आणि विज्ञानकोशाचे दोन खंड अशी वेगवेगळ्या प्रकारातील पुस्तके इ.स. १९३३ ते १९६५ या कालावधीत सामंतांनी प्रकाशित केली.
 
कोल्हापूरच्या एस.एम.टी.टी. महाविद्यालयातून सामंतांनी अध्यापनक्षेत्रातील पदवी मिळवली होती. इ.स. १९३८ ते १९५० या काळात गिरगावातील 'चिकित्सक हायस्कूल' मध्ये शिक्षक म्हणून काम केले. इ.स. १९४१ साली त्यांनी 'चिरंजीव' या चित्रपटनिर्मितीतही भाग घेतला होता. 'चिकित्सक'मधील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी खंडाळ्याला 'घरकुल' हे लाॅजिंग बोर्डींग इ.स. १९५० ते १९५३ या काळात चालवले. इ.स. १९५७ साली रघुवीर सामंत पुन्हा अध्यापन व्यवसायाकडे वळाले. इ.स. १९५७-५८ ही दोन वर्षे पालघरजवळच्या सातपाटी येथील 'आदि जनता हायस्कूल'मध्ये मुख्याध्यापक, इ.स. १९५९ साली माहीमच्या लोकमान्य विद्यालयात फर्स्ट असिस्टंट, इ.स. १९६० साली मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यावर इ.स. १९६१च्या जानेवारी महिन्यात ठाकुरद्वारच्या मराठा मंदिर शाळेत त्यांची बदली करण्यात आली. इ.स. १९६१च्या जून महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन सामंत अध्यापन व्यवसायापासून दूर झाले.