"नानाजी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५६:
 
==चरित्र ==
[[परभणी]] आता [[हिंगोली]] जिल्ह्यातील [[कडोळी]] या गावी [[ब्राह्मण]] कुटुंबात जन्मलेल्या नानाजींनी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्य केले. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस त्यांनी शाश्र्वत विकास साधणारे समाजकार्य करायचे ठरवले व त्या क्षेत्रात सुयश प्राप्त केले. लहानपणी भाजी विकून - पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करणारे नानाजी संघसंस्थापक डॉ. [[केशव बळीराम हेडगेवार|हेडगेवार]] यांच्या संपर्कात आले व संघाशी कायमचे जोडले गेले. भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती स्थान देऊन रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प नानाजी देशमुख यांनी देशभरात उभे केले.
 
प्रथम [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] [[स्वयंसेवक]] व नंतर [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशात]] पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या नानाजींनी संघाचे तत्कालीन प्रमुख ([[सरसंघचालक]]) श्री [[गोळवलकर गुरुजी]] यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. यातूनच [[जनसंघ|जनसंघाची]] स्थापना झाली. [[दीनदयाळ उपाध्याय]], [[सुंदरलाल भंडारी]], [[अटलबिहारी वाजपेयी]] व [[लालकृष्ण अडवाणी]] यांच्यासमवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. नंतर [[जनता पक्ष|जनता पक्षाच्या]] माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय सहभागी झाले. [[पांचजन्य]], [[राष्ट्रधर्म]] व [[स्वदेस]] या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. [[राम मनोहर लोहिया]], [[जयप्रकाश नारायण]], [[चरणसिंग]] या अन्य विचारधारेच्या नेत्यांशीही त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. दरम्यानच्या काळात आचार्य [[विनोबा भावे|विनोबा भावेंच्या]] [[भूदान चळवळ|भूदान चळवळीतही]] ते सहभागी झाले होते. सुमारे दोन महिने ते विनोबाजींबरोबर प्रवास करत होते. पण त्यानंतरच्या काळात मनुष्यविकास व सामाजिक विकास याबाबतच्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावाद या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक, विधायक कामांची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रीपद नाकारले. त्या काळात राजनीतीतील चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीत दबदबा होता, अनेक महत्त्वाची सत्तापदे त्यांच्याकडे सहजगत्या येत होती. पण त्यांनी तो मोह निग्रहाने नाकारून, राजकारण-संन्यास घेऊन अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला. या विचारातूनच त्यांनी [[दीनदयाळ संशोधन संस्था]] स्थापन केली.