एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. मराठीमधला आई हा शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्वमहत्त्व प्राप्त झालेले आहे. अनादी अनंत काळापासून आई म्हणजे निस्सीम प्रेमाचे आणि माया-ममतेचे प्रतीक समजले गेले आहे. आई या विषयावर अनेकांनी काव्येआणि निबंध लिहिले आहेत. रामायणातील महानायक श्रीरामचंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी अयोध्या श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीमध्येही आई या विषयावर अनेक कविता रचलेल्या आहेत. मराठीतील कवी यशवंत यानी आपल्या कवितेत पुढील ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगितलेली आहे.