"धीरूभाई अंबाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२:
इ.स. १९५९ साली धीरूभाई यांनी १५,०००/- रुपयांची गुंतवणूक करून मशीदबंदर [[मुंबई]] येथे त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी (नात्याने दूरचे मामा) यांच्यासह ६५:३५ अशी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले (मिरी, लवंग, सुपारी, सुंठ, तमालपत्र, हळद, काजू इ.) आणि कापडाचा (रेयॉन) व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते. खरे काम भारतात धीरुभाई आणि एडनमध्ये ज्येष्ठ सांभाळू लागले.
 
मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. पहिले अपत्य [[मुकेश अंबाजी]] (जन्म:१९/एप्रिल/१९५७ मध्ये)धीरूभाई यांचे दुसरे अपत्य अनिल याचा जन्म जून इ.स. १९५९ मध्ये, थोरली मुलगी दीप्ति हिचा जानेवारी १९६२ मध्ये तर धाकटी मुलगी नीना हिचा जन्म जुलै इ.स. १९६२ मध्ये झाला. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. शिवाय लहान भाऊ नटुभाई यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही कामास मदत करू लागले.
 
इ.स. १९६६ साली धीरूभाई अंबाणी यांनी [[अमदाबाद|अमदावाद]] जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरूवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. इ.स. १९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड [[रशिया]], [[सौदी अरेबिया]], [[पोलंड]], [[झांबिया]], [[युगांडा]] इ. देशांमध्ये निर्यात करण्यास सुरूवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चधू लागले. इ.स. १९७५ साली जागतिक बँकेने 'विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प' म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली.
 
इ.स. १९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नासाठी सुमारे ५८,००० लोकांनी आपले पैसे गुंतविले. इ.स. १९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायत पूर्णपणे उतरले. त्यांनी '''[[विमल''']] या नावाने कापड विक्रीस सुरूवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरूभाईंनी इ.स. १९७७ ते इ.स. १९८० या काळात देशभरात विमलची शोरूम थाटली.
 
इ.स. १९८१ साली मुकेश अंबाणी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले तर इ.स. १९८३ साली अनिल अंबाणी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले.