"किशोर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३३:
मुंबईत येऊन किशोर प्रधान यांनी एम.ए. केले आणि [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’]]मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळवून शिक्षण पूर्ण केले. लगेचच ग्लॅक्सो कंपनीत चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळाली, तरी अंगातील कला आणि नाटकाची ओढ स्वस्थ बसू देईना. कामावरून घरी आल्यावर डोक्यात नाटकाचेच विचार चालायचे. अशा ध्यासातून बांद्रा येथील एमआयजी (मिडल इन्कम ग्रुप) कॉलनीतल्या हौशी नाटकवेड्यांना घेऊन किशोर प्रधान यांनी नटराज ही नाट्यसंस्था काढली, आणि ’तीन चोक तेरा’ हे नाटक करावयाचे ठरविले.
नाटकाची तयारी जोरात सुरू झाली, पण नायिका कोण ते ठरेना. कुणीतरी माहिती आणली की आपल्या कॉलनीतली एक मुलगी नाटकात कामे करते. तिचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. तासन्तास बसस्टॉपवर ताटकळत राहिल्यावर एके दिवशी ती दिसली. पाहता क्षणीच तिला आपल्या नाटकाची नायिका म्हणून पसंत केली. तिच्या घरच्यांची परवानगी मिळविण्याची जबाबदारी नाटकाचा दिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांच्याकडे आली. आधी पसंत केलेल्या ३-४ नायियांच्या घरून नकारघंटा मिळाली होती, त्यामुळी भीतभीतच किशोर प्रधान आपल्या ३-४ मित्रांसह त्या मुलीच्या घरी गेले. मुलीचे वडील त्या काळचे सुप्रसिद्ध नाटककार व्यंकटेश वकील निघाले. पण त्यांना भेटल्यावर किशोर प्रधानांची बोबडीच वळली आणि तोंडातून शब्द फुटेना. मित्र मदतीला आले, आणि त्यांच्या विनंतीवरून व्यंकटेश वकिलांनी आढेवेढे न घेता, शोभा वकील हिला म्हणजे त्यांच्या मुलीला नाटकात काम करण्यास परवानगी दिली. दोन महिन्यात नाटक कॉलनीतल्या छोट्या कम्युनिटी हॉलच्या रंगभूमीवर आले,
|