"चोळ साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Replacing png with svg (File:Rajendra map new.pngFile:Rajendra map new.svg)
No edit summary
ओळ २७:
| आजचे_देश = {{flag|भारत}}<br />{{flag|श्रीलंका}}<br />{{flag|बांग्लादेश}}<br />{{flag|बर्मा}}<br />{{flag|थायलंड}}<br />{{flag|मलेशिया}}<br />{{flag|कंबोडिया}}<br />{{flag|इंडोनेशिया}}<br />{{flag|व्हियेतनाम}}<br />{{flag|सिंगापूर}}<br />{{flag|मालदीव}}
}}
'''चोळ साम्राज्य''' ([[तमिळ भाषा|तमिळ]]: சோழ நாடு, ''चोळर कुळ'' ; [[रोमन लिपी]]: ''Chola dynasty'') हे दक्षिण [[भारत|भारतातील]] एक [[साम्राज्य]] होते. दक्षिण भारतातील हे सर्वांत दीर्घकाळ टिकलेले साम्राज्य होते. याचे सर्वांत जुने संदर्भ [[मौर्य साम्राज्य|मौर्य सम्राट]] [[सम्राट अशोक|अशोकाने]] घडवून घेतलेल्या [[अशोकस्तंभअशोकाचे शिलालेख|अशोकस्तंभांवरील]] लेखांत]] (निर्मितिकाळ अंदाजे इ.स.पू. २७३-इ.स.पू.२३२) आढळतात. त्यानंतर [[इ.स.चे १३ वे शतक|इ.स.च्या १३व्या शतकापर्यंत]] राज्यविस्ताराच्या कक्षा बदलत राहिल्या असल्या, तरीही चोळांची सत्ता टिकून होती.
 
[[कावेरी नदी|कावेरी नदीच्या]] खोऱ्यात चोळांच्या सत्तेचा उदय झाला. [[इ.स.चे ९ वे शतक|इ.स.च्या ९व्या शतकापासून]] इ.स.च्या १३व्या शतकापर्यंतचा काळ चोळ साम्राज्याचा परमोत्कर्षाचा काळ होता. [[पहिला राजराज चोळ]] व [[पहिला राजेंद्र चोळ]] यांच्या काळात चोळ साम्राज्य प्रभावी सैनिकी, आरमारी, आर्थिक व सांस्कृतिक सत्ता बनले. या काळात चोळांचे साम्राज्य [[भारतीय द्वीपकल्प]] व [[आग्नेय आशिया]]त पसरले. पहिल्या राजराज चोळाने द्वीपकल्पीय दक्षिण भारत जिंकला, [[श्रीलंका|श्रीलंकेचा]] काही भाग जिंकून [[मालदीव]] द्वीपसमूहावर कब्जा मिळवला{{संदर्भ हवा}}. पहिल्या राजराजाचा पुत्र असलेल्या पहिल्या राजेंद्र चोळाच्या राजवटीत चोळ आरमाराने [[श्रीविजय साम्राज्य|श्रीविजय साम्राज्यास]] नाविक युद्धात नमवून आग्नेय आशियात राज्य विस्तारले, तसेच [[पाटलीपुत्र|पाटलीपुत्राच्या]] [[पाल साम्राज्य|पाल साम्राज्याच्या]] सैन्याचा पराभव करत वर्तमान [[आंध्र प्रदेश|आंध्र प्रदेशातील]] [[गोदावरी नदी|गोदावरी तीरापर्यंत]] राज्य विस्तारले. इ.स.च्या १३व्या शतकाच्या आरंभी दक्षिण भारतात [[पांड्य साम्राज्य|पांड्यांची]] प्रतिस्पर्धी सत्ता वाढू लागली, तसतसे चोळ साम्राज्यास उतरण लागली. अखेरीस इ.स. १२७९च्या सुमारास तिसऱ्या राजेंद्र चोळाच्या सैन्याचा पराभव करून पांड्यांनी चोळांची सत्ता संपुष्टात आणली{{संदर्भ हवा}}.