'''मी शिवाजीराजे भोसले बोलतोय''' हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक [[मराठी चित्रपट]] आहे.. या चित्रपटची निर्मिति संजय छाबड़िया आणि अष्वमि मांजरेकर यांनी केली आहे. दिग्दर्शन संतोश मांजरेकर यांनी केले आहे.
कथानक :
दिनकर मारुती भोसले हे मुंबईतील आपण आपली ओळख गमावली आहे असे वाटत असणाऱ्या हजारो मराठी लोकांचे प्रतिनिधित्व करतात.त्यांना वाटते मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र मुंबईत उरलेला नाही.मरठी लोकांना मुंबईत मिळणाऱ्य कमी आदराबद्द्ल त्यांना नेहमी तक्रार असते. ते मराठी असल्यामुळे त्यांना नेहमी पिडित असल्याचे जाणवते.थोडे त्यांनी स्वत: स्वत: वर ही परिस्थिती आणली आहे की लक्षात घेऊन.पूर्ण निराशेत आपण मराठी का जन्माला आलोत या कारणासाठी स्वत:ला कोसत असतात. त्यांना वाटते त्यांच्या पूर्वजांनी खूप वाईट काम केल्यामुळे माझा जन्म मराठीत झाला. त्याच्या या विचारामुळे प्रतापगडावरील शिवाजी महाराज जागे झाले. शिवाजी महाराज त्याच्याकडे येऊन त्याला ओरडतात. ते म्हणतात आदर हा मिळवावा लागतो, मागावा लागत नाही. ते म्हणतात 'दुसऱ्या समाजाला दोष देण्यापूर्वी तू मराठीच्या गर्वासाठी काहितरी केले आहेस का ते बघ.' दिनकरला आपली चूक कळते, पण शिवाजी महाराजांच्या विचारांनी जागा होउन आपल्या चूका बरोबर करेल? भोसले शिवरायांची तलवार त्यांना परत करतो;असा चित्रपटचा शेवट होतो.