आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईनी शारीरीकशारीरिक श्रमाचे महत्वमहत्त्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. मुक्तिसदना’मुक्तिसदना' त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या साह्यानेमदतीने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता सायं घरकुलाची व्यवस्था त्यांनी केली.
आपल्या या प्रवासात रमाबाईंना देशभरातील स्त्रियांच्या हलाखीच्या परिस्थितीची कल्पनाही आली. उच्च जाती पुढारल्याचा दावा करीत असल्या तरी त्यातील स्त्रियांचे मागासलेपण किती आहे, हेही त्यांना अस्वस्थ करत होते. विचारांनी अतिशय पुरोगामी असलेल्या रमाबाईंनी याच काळात बाबू बिपिन बिहारी माघनी या बिहारमध्ये रहाणार्या बंगाली वकिलाशी लग्न केले. पण ते हलक्या जातीचे होते. त्यांच्या या विवाहाने तत्कालीन सनातनी समाजात एकच खळबळ उडाली. टीकेचा भडीमार झाला. पण ते वादळही अल्पावधीत मिटले. त्यांना मनोरमा नावाची मुलगीही झाली. पण रमाबाईंच्या आयुष्याती दुर्देवाचे दशावतार मात्र संपले नाही.आयुष्यात सुखाचे दिवस आले असे वाटत असतानाच त्यांच्या पतीचे याच काळात निधन झाले. आणि हिंदू समाजातील विधवेला काय काय सहन करावे लागते, याचा अनुभव त्यांना आला. केशवपनापासून अनेक प्रथा हिंदू समाजातील उच्च जातीच्या स्त्रियांना पाळाव्या लागत. रमाबाईंना हे सारे सहन होईना.