"द्रौपदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Draupadi humiliated RRV.jpg|thumb|right|200px250px|विराट राजाच्या दरबारात कीचकाकरवी अपमानित झालेली द्रौपदी (चित्रकार : [[राजा रविवर्मा]])]]
{{विस्तार}}
[[चित्र:Draupadi humiliated RRV.jpg|thumb|right|200px|विराट राजाच्या दरबारात कीचकाकरवी अपमानित झालेली द्रौपदी (चित्रकार : [[राजा रविवर्मा]])]]
'''द्रौपदी''' ही [[महाभारत|महाभारतातील]] एक प्रमुख व्यक्तिरेखा असून, ती [[पांचाल|पांचालाच्या]] राजा [[द्रुपद|द्रुपदाची]] दत्तक कन्या व पाच [[पांडव|पांडवांची]] पत्नी होती. महाभारतीय युद्धानंतर [[कौरव|कौरवांवर]] विजय मिळवून [[युधिष्ठिर]] [[हस्तिनापुर|हस्तिनापुराचा]] राजा बनल्यावर द्रौपदी पट्टराणी झाली.
 
== जन्म ==
द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास युद्धात हरवुन अर्धे राज्य घेतल्यामुळे [[द्रोणाचार्य|द्रोणाचार्यांचा]] वध करण्यासाठी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या ज्वाळांमधून द्रौपदी व धृष्टध्युम्न ही जुळी बहीण भावंडे बाहेर आली. ही बहीण भावंडे कुमारवयीन होती. धृष्टध्युम्न व द्रौपदी यांना अयोनिसंभव असे म्हणत - म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयातून ज्यांचा जन्म झाला नाही असे. द्रुपदाची कन्या म्हणून तिला द्रौपदी असे म्हणत पण तिचे खरे नाव कृष्णा होते व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते. तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे. तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती. तिला कल्याणी असे देखील म्हटले जात असे.
 
द्रौपदीला आणखीही काही नावे होती. बरेच वेळा असा गैरसमज करून घेतला जातो की द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह झाला, म्हणून तिला पांचाली म्हणतात. खरे तर ती [[पांचाल]] राज्याची राजकन्या म्हणून तिला पांचाली म्हटले जात असे. यज्ञातून उत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी असे देखील म्हटले जाई.
 
द्रौपदी [[शिखंडी]]ची बहीण होती. [[कृष्ण]] हा दौपदीचा सखा होता.

== पण व पांडवांशी विवाह ==
द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा सम्राट द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. छताला लावलेल्या माशाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडेल, अशी व्यवस्था केली गेली होती. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी माशाचा डोळा नेम धरून फोडेल, त्यालाच द्रौपदी वरेल, असा तो पण होता. अर्जुनाने हा पण जिंकला होता. मात्र कुंतीच्या तोंडून अनावधानाने निघालेल्या शब्दांमुळे द्रौपदीला अर्जुनासोबत इतर चार पांडवांनादेखील वरावे लागले.
 
पाच पांडवांशी विवाह झालेला असूनही द्रौपदीस पतिव्रता म्हटले जाते. अहिल्या, सीता, तारा व मंदोदरी यांच्यासोबतच द्रौपदीचे नावदेखील पंचकन्यांमधे आदराने घेतले जाते. श्रीकृष्णाची दुसरी पत्नी सत्यभामा हिने गृहीणीपद व पतिची मर्जी कशी सांभाळावी याबद्दल द्रौपदीकडून सल्ला घेतला होता. या संवादालाच [[द्रौपदी-सत्यभामा-संवाद]] असे म्हणतात.
 
== द्यूतप्रसंग आणि वस्त्रहरण ==
द्युतप्रसंगीद्यूतप्रसंगी धृतराष्ट्र पुत्र [[दुर्योधन]] व [[दु:शासन|दु:शासनाकरवी]] झालेले वस्त्रहरण हा द्रौपदीच्या जीवनातील सर्वात मोठा मानहानीचा प्रसंग होता. त्या प्रसंगातदेखील द्रौपदीने आपल्या संयमाची व बुद्धीमत्तेचीबुद्धिमत्तेची चुणूक सभाजनांना दाखवून दिली होती. "माझ्या पतिनेपतीने आधी स्वत:ला पणाला लावले असल्यास नंतर मला पणाला लावण्याचा अधिकार त्यांना उरतो का?" या तिच्या प्रश्नाने भिष्मभीष्म पितामहांनादेखील निरूत्तर केले होते. वस्त्रहरणासारख्या प्रसंगामधे पतिंनीपतींनी सर्व अधिकार गमावल्यानंतर द्रौपदीने आपला सखा कृष्ण याचा धावा केला होता. तिच्या हाकेला प्रतिसाद देत कृष्णाने द्रौपदीच्या सन्मानाचे रक्षण केले.
 
दुर्योधन व दु:शासनाच्या हीन कृतींकडे दुर्लक्ष करणार्‍या धृतराष्ट्रालादेखील द्रौपदीच्या वक्तव्याची दखल घेणं भाग पडलं होतं. आपल्या पुत्रांना द्रौपदीच्या शापांपासून वाचविण्यासाठी धृतराष्ट्राने तिला अनेक वरदाने देऊ केली होती, मात्र क्षत्रिय स्त्री च्यास्त्रीच्या धर्मानुसार आपल्याला केवळ दोनच वर मागण्याचा अधिकार आहे, असे उत्तर देऊन द्रौपदीने स्वत:वर ओढवलेल्या लाजिरवाण्या प्रसंगातदेखील आपल्या इच्छांवर असलेला संयम व ताळ्यावर असलेले चित्त दाखवून दिले होते. द्रौपदीच्या चतुराईमुळेच पांडव व त्यांचे पुत्र, त्यांच्या रथ व अस्त्र शस्त्रांसकट दुर्योधनाच्या दास्यत्वातून मुक्त होऊ शकले होते व त्यांना त्यांचे राज्यदेखील परत मिळाले होते. पण युधिष्ठीराच्या द्युतलालसेमुळेद्यूलालसेमुळे त्यांना पुढच्याच क्षणी राज्य गमवावे देखील लागले व बारा वर्षांचा [[वनवास]] आणि एक वर्षाचा [[अज्ञातवास]] त्यांच्या नशीबी आला.
 
द्रौपदीने अशी प्रतिज्ञा केली होती की तिच्या केसांना धरून ओढणार्‍या दु:शासनाच्या छातीचे रक्त जोपर्यंत ती आपल्या केसांना लावणार नाही, तोपर्यंत ती केस मोकळेच ठेवेल. भीमाने महाभारतातील युद्धामधे दु:शासनाचा वध करून, त्याची छाती फोडली आणि त्याचे रक्त द्रौपदीच्या केसांना लावून तिची वेणी घातली व द्रौपदीची प्रतिज्ञा पूर्ण केली.
 
== वनवासात आणि महाभारतीय युद्धात ==
वनवासातदेखील द्रौपदीचे अपहरण करण्याचा प्रयत्न कौरवांचा मेव्हणा व [[दु:शला|दु:शिलेचा]] पति [[जयद्रथ]] याने केला होता. मात्र युधिष्ठीरामुळे त्याला जीवदान मिळाले. अज्ञातवासामधे द्रौपदीने आपली ओळख लपविण्यासाठी सैरंध्री हे नाव वापरले होते. सैरंध्रीचा अर्थ रूपसज्जा करण्यास मदत करणारी राणीची दासी. सैरंध्रीच्या रूपात [[विराट]] राजाची पत्नी [[सुदेष्णा]] हिच्या महालात काम करतानादेखील सुदेष्णेचा भाऊ व विराट राजाचा सेनापती [[कीचक]] याने द्रौपदीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
 
Line २६ ⟶ ३१:
* [[द्रौपदी-सत्यभामा-संवाद]]
 
{{विस्तार}}
{{महाभारत}}
[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/द्रौपदी" पासून हुडकले