"शहाजीराजे भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Aneeshwiki (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
Aneeshwiki (चर्चा | योगदान) निजामशहीची अखेर Added from https://en.wikipedia.org/wiki/Shahaji खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ ५०:
==निजामशहीची अखेर==
नन्तर निजामशही वझीर, जहान खानने, निजामाला मारले, आणि शहाजीराजाना निजामशहीत मिळवले. शहाजहानने दरम्यान सगळ्या निजामशहीतील पुरुषाना ठार
शहाजहानने ४८,००० सैन्य निजामशाही, आदिलशही संपवण्यासाठी पाठवली तेव्हा घाबरुन आदिलशहा, शहाजहानला मिळाला. शहाजी व निजामशाहीचा टिकाव लागणे शक्य नव्हते, तरीही शहाजीने नेटाने लढा चालू ठेवला. दरम्यान १ वर्षाचा मुर्तझा शहाजहानच्या हाती लागला. तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या आईला दिलेल्या शब्दासाठी त्यांनी शहाजहानशी तह केला. या तहांतर्गत मुर्तझा शहाजहानकडे सुरक्षित राहिल आणि शहाजी आदिलशहीत मिळेल. सावधगिरी म्हणुन शहाजीराजांना दक्षिणेला बंगळूरची जहागिरी दिली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता तो त्यांच्या कडेच् ठेवला.
शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. त्यानी दक्षिणेतील राजांवर विजय मिळवून दक्षिणेला आदिलशहीचा विस्तार केला. पण हे करताना त्या हरलेल्या राजाना शिक्षा किंवा देहदंड न करता त्याना माण्डलिक ठेवले, जेणे करुन गरज पडली तेव्हा हे राजे त्यांच्या मदतीला आले.
दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने [[बाजी घोरपडे]], [[मंबाजी भोसले]], [[बाजी पवार]], [[बाळाजी हैबतराव]], [[फतहखान]], [[आझमखान]] यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, [[इ.स. १६४८]] चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, [[इ.स. १६४९]] रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.
|