"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २१:
| प्रभावित =
| पुरस्कार = राष्ट्रपती पुरस्कार (केंद्र शासन, २०१२), [[गं.ना.जोगळेकर]] स्मृती पुरस्कार ([[महाराष्ट्र साहित्य परिषद]], २०१०), [[जयश्री गुणे]] सन्मानपत्र ([[ज्ञान प्रबोधिनी]], २००५), कालिदास पुरस्कार (महाराष्ट्र शासन, २००४), साहित्यसम्राट [[न.चिं.केळकर]] पारितोषिक ([[केसरी मराठा संस्था]], १९९२).
| वडील_नाव = आण्णाबुवाअण्णाबुवा अर्थात् श्रीनिवास कृष्ण अर्जुनवाडकर
| आई_नाव = जानकी श्रीनिवास अर्जुनवाडकर
| पती_नाव =
ओळ ३५:
==जीवन==
 
वडील श्रीनिवास कृष्ण अर्थात अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने संस्कृताचे अध्ययन केल्यावर {{लेखनाव}} यांनी पुण्यात [[विष्णुशास्त्री बापट]] यांनी सुरू केलेल्या [[आचार्यकुल|आचार्यकुलात]] तीन वर्षे राहून (शांकर)[[वेदान्त|वेदान्ताचा]] अभ्यास केला. पुण्याच्या [[वेदशास्त्रोत्तेजकसभा|वेदशास्त्रोत्तेजकसभेची]] परीक्षा देऊन अद्वैत-वेदान्त-कोविद ही बी.ए.-समकक्ष पदवी त्यांनी १९४१ साली वयाच्या १५व्या वर्षी मिळवली. बेळगावला परत जाऊन एक वर्ष कारकुनाची नोकरी केल्यावर - आणि पारंपरिक विद्येचा उपजीविकेसाठी थेट उपयोग नाही हे लक्षात आल्यावर - [[विश्वनाथ विनायक पेंडसे|विश्वनाथ विनायक अर्थात् आप्पाअप्पा पेंडसे]] यांच्या प्रेरणेने ते पुण्याला परत आले. आल्यावर अर्जुनवाडकरांनी अनेक अडथळे पार करून आधुनिक शिक्षणव्यवस्थेत शिरकाव करून घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी इयत्ता (मराठी) पहिलीत एक वर्ष त्यांनी काढले. पारंपरिक अध्ययनातून झालेल्या तयारीची कल्पना आणि कदर असणारे शिक्षणाधिकारी [[रंगाचार्य रेड्डी]] यांच्यामुळे त्यांना इंग्रजी पहिलीत थेट उडी मारता आली. शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांबद्दल स्पष्टता आणि शिक्षणाची आच असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल अपार आस्था असणारे पुण्याच्या जिमखाना भावे स्कूलचे द्रष्टे मुख्याध्यापक [[नीलकंठ वा. किंकर|नी.वा. तथा बापूसाहेब किंकर]] यांनी परीक्षा घेऊन त्यांना थेट इंग्रजी सहावी अर्थात् प्री-मॅट्रिक वर्गात प्रवेश दिला. ते १९४६मध्ये मॅट्रिक झाले. या परीक्षेतल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना संस्कृतातल्या प्रावीण्यासाठीची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीसाठीची त्यांची तयारी त्यांचे गुरू आणि पुढील काळातले सहकारी [[अरविंद गंगाधर मंगरूळकर]] यांनी करून घेतली होती.
 
पुढील काळात [[सं-म-त]] अर्थात् संस्कृत-मराठी-तमिळ यांच्या भाषिक नात्यांबद्दल नवीन सिद्धान्त मांडणारे भाषातज्ञ [[विश्वनाथ आबाजी खैरे]], १९६०च्या दशकात काँग्रेस गवतामुळे निर्माण झालेल्या ॲलर्जीचा अभ्यास करणारे त्वचारोगतज्ञ [[अरविंद लोणकर]], कृषि-अर्थशास्त्रज्ञ, महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक चळवळींचे अभ्यासक आणि लेखक [[सखाराम हरी देशपांडे]], संस्कृतज्ञ आणि मराठी कवी [[वसंत संतू पाटील]] हे त्यांचे या काळापासूनचे जवळचे मित्र.