"सिंधी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ४:
कराची ही सिंध प्रांताची राजधानी होती आणि सिंधच्या शैक्षणिक विकासासाठी मुंबईच्या नारायण जगन्नाथ या शिक्षकाला तिथे खास बोलावण्यात आले होते. त्यांच्याच नावे सिंधमधील पहिली मराठी शाळाही सुरू झाली. आजही कराचीत ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुटीत कराचीच्या बंदरावरून बोट पकडून मुंबईचे बंदर गाठायचे आणि मग कोकणात आपल्या गावी जायचे, हा अनेक मराठी कुटुंबांचा तेव्हाचा रिवाजच होता. कराचीचे विद्यार्थीही मुंबईच्या विल्सन कॉलेजात बोटीने येत असत. इ.स. १९६१ सालापर्यंत गोव्याहून सुटलेली बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची आगबोट कोंकणातली व सौराष्ट्र-कच्छमधील बंदरे घेत कराचीला जात असे. फाळणीनंतर फार तुरळक मराठी लोक कराचीतच राहिले. कराचीच्या लोकसंख्येत १२.८१ टक्के ‘अन्यभाषिक’ म्हणून समजलेल्या गटात मराठी लोकही आहेत. तेथील महादेव मंदिरात दरवर्षी दीड दिवसाचा गणेशोत्सवही मराठी पद्धतीने साजरा होतो. कराचीतल्या विविध देवळांत पुजारी म्हणून गेली चार दशके धार्मिक विधी करणारे मोहन गायकवाड हे भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा करतात. ‘द डेली टाइम्स’ या पाकिस्तानी वृत्तपत्राला गायकवाड यांनी सांगितले की, कराचीतल्या या उत्सवासाठी पाकिस्तानातल्या अन्य भागांतील मराठी लोकही आवर्जून येतात. मंडप उभारला जातो, मोदक केले जातात, लोक गाणी गातात, आरत्या म्हणतात, नाचतात. या पूजेच्या निमित्ताने आपल्या लोकांना भेटता येते आणि खूप आनंद वाटतो, असे अनेकांनी सांगितले. दीड दिवसाच्या गणपतीचे मग अरबी समुद्रात यथाविधी विसर्जनही केले जाते. आज कराचीतील मराठी लोकांनी अतिशय प्रतिकूल सांस्कृतिक परिस्थितीतही आपली मराठी भाषा वा संस्कृती टिकविण्याची धडपड सुरू ठेवली आहे.
 
कराचीतील मराठीभाषकांत आणखी एक वर्ग आहे तो बेनेइस्त्रायलींचाबेनेइस्रायलींचा. कराचीतील ६३० बेनेइस्त्रायलीबेनेइस्रायली कुटुंबे अन्य भागांत विखुरली. झियांच्या कारकिर्दीतील हिंसक विरोधानंतर त्यातील कित्येकांनी आपली धार्मिक ओळख लपविली आहे. कित्येक पार्शी असल्याचेही भासवत आहेत. मात्र घरात ते उर्दू व मराठीत बोलतात.
 
फाळणीनंतर सिंध हा प्रदेश पाकिस्तानात गेला. तेव्हा मराठीजन आपली घरे मागे टाकून भारतात आले. त्यातील कित्येकांनी दिल्लीतही आसरा घेतला. सिंधमध्येसिंधमधील सिंधी भाषा बोलणारे लोक मात्र महाराष्ट्रातील पुण्याजवळच्या पिंपरी आणि कल्याणजवळच्या अंबरनाथ या गांवी आले. पिंपरीजवळ सिंधी कॉलनी उभी राहिली आणि अंबरनाथजवळ उल्हासनगर.
 
 
==सिंधी भाषा==
सिंधी भाषा ही आधुनिक आर्यभाषांपैकी एक भाषा आहे. तिचा उगम संस्कृत भाषेपासून झाला आहे. ती मुळात देवनागरी लिपीत लिहिली जात असे. इ.स. १८५३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सिंधी लिपीनिश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली. त्या समितीने काही अरबी आणि काही फारसी वर्ण एकत्र करून तिसरीच एक लिपी तयार केली. तीच सध्याची अरबी-सिंधी लिपी होय. या लिपीत ५२ वर्ण आहेत. आधुनिक सिंधी वाङ्‌मय प्रामुख्याने याच लिपीत लिहिले गेले आहे. या लिपीबरोबर आज्सिंधीचेआज सिंधीचे देवनागरी रूपही प्रचलित आहे.
 
;सिंधी लिपीत ५२ वर्ण आहेत. ते असे :
ओळ ४७:
* मनाचे श्लोक (सिंधी भाषांतर)
* सिंधी लघुकथा (मराठी भाषांतर)
* चला सिंधी शिकू या (मराठी माणसांना सिंधी भाषा शिकण्यासाठीचे पुस्तक). या पुस्तकाचे प्रकाशन(इ.स.२०१३) हर्दवाणी यांनी स्वतःच केले आहे. या पुस्तकात सिंधी आणि मराठी भाषेतील साम्यस्थळे आणि दोन्ही भाषेतील समान अर्थाचे आणि समान उच्चाराचे किमान ५००० शब्द दिलेले आहेत.
 
==सिंधी भाषेसंबंधी ब्रिटिश आमदानीत प्रसिद्ध झालेले ग्रंथ==