"नागनाथ रामचंद्र नायकवडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
ओळ २०:
| आई नाव = लक्ष्मीबाई
| पती नाव =
| पत्नी नाव =कुसुमताई अधिक माहिती हवीनायकवडी
| अपत्ये = किरन,अरुन,वैभव
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
ओळ ३१:
==चळवळ==
१९४२ च्या स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी बालवयातच आपल्या कोवळ्या मुठीत क्रांतीचा अंगार आणि धगधगता निखारा घेऊन ते घरात पुन्हा पाऊल न ठेवण्याची शपथ घेऊन घराबाहेर पडले. [[धुळे|धुळ्याजवळ]] चिमठाण्याचा खजिना लुटण्यात त्यांचा सहभाग होता. [[सातारा|साताऱ्यात]] [[नाना पाटील|नाना पाटलांच्या]] पत्री सरकारमध्ये त्यांचा सहभाग होता. १९४३ साली सागाव (कोल्हापूर) येथील पोलिस चौकीतून त्यांनी बंदुका पळविल्या व ती हत्यारे घेऊन त्यांनी सहकाऱ्यांसह वाळव्यातून फेरी काढली. १९५७ आणि १९८५ असे दोन वेळा वाळवा मतदार संघातून ते विधानसेभेवर निवडून गेले. राजकारणात त्यांनी आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती. १९८५ साली विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्यांना सिंह निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले होते. पण अण्णाचे कार्यकर्ते एवढे जंगी होते की, निवडणूक प्रचारात त्यांनी खराखुरा सिंह प्रचाराला आणला होता. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी गावात बालवाडी काढली. मग शाळा, मग हायस्कूल आणि मग विद्यार्थ्यांच्या मदतीने हुतात्मा किसन अहीर साखर कारखाना काढला.
वाळवा तालुका म्हणजे कर्तबगार लोकांचा तालुका.अशा तालुक्याला भूषण ठरलेल्या काही मोजक्या हस्तींमध्ये क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव अग्रस्थानी येते. थोर स्वातंत्र्यसेनानी नागनाथअण्णांचा इतिहासात तर उल्लेख आहेच, पण सहकाराचा दीपस्तंभ आणि सामाजिक चळवळीचा धगधगता अग्निकुंड म्हणूनही संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो.
धगधगता जीवनपट
 
पूर्ण नाव : नागनाथ रामचंद्र नायकवडी (अण्णा)
 
जन्मगाव : वाळवा, ता. वाळवा (सांगली)
 
जन्म तारीख : १५ जुलै १९२२
 
वडिलांचे नाव : रामचंद्र गणपती नायकवडी.
 
आईचे नाव: लक्ष्मीबाई नायकवडी.
 
शिक्षण : १९४८ ला मॅट्रीक पास.
 
शाळेत असताना व्यायामाची खूप आवड, कुशल संघटक.
 
सन १९३0 - क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याशी विद्यार्थी दशेत ओळख.
 
सन १९३९ - कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट. सेवादलात सक्रीय सहभाग.
 
सन१९४0 - कामेरी जि. सांगली येथे पहिली विद्यार्थी परिषद घेतली.
 
सन ८ ऑगस्ट १९४२ - काँग्रेसच्या करेंगे या मरेंगे चळवळीत सहभाग.
 
सन ७ जून १९४३ - शेणोली स्टेशन येथे पे स्पेशल ट्रेन लुटीत सहभाग.
 
सन ३ ऑगस्ट १९४३ - नाना पाटील नेतृत्वाखाली प्रतिसरकार स्थापन, पणुंब्रे येथे.
 
सन १४ एप्रिल १९४४ - धुळे खजिना लुटीत चित्तथरारक सहभाग.
 
सन २५ फेब्रुवारीला हुतात्मा किसन अहिर व नानकसिंग सहकारी शहीद. जीवलग दोस्त गेल्याचे दुख.
 
सन १९४८ ते १९५७ - सामाजिक-राजकीय चळवळीत सक्रीय.
 
सन १३ फेब्रुवारी १९५0 - बुंगवाडी येथील यशवंत गोविंद कदम (ता. तासगाव) यांच्या कन्येशी कोल्हापुरात सत्यशोधक पध्दतीने लग्न.
 
सन १९५७ - आमदार म्हणून लोकांनी निवडून दिले.
 
सन १९४९ - वाळव्यात हुतात्म्यांची स्मारके म्हणून किसान शिक्षण संस्थेची स्थापना. गरीब मुलांसाठी वसतीगृहाची स्थापना.
 
सन १९६३ - मुलींनी शिकावे म्हणून जिजामाता विद्यालयाची स्थापना केली.
 
सन १९६५ - मुलींसाठी सावित्रीबाई फुले वसतीगृहाची स्थापना.
 
सन १९७२ - शेतीला पाणी मिळावे म्हणून किसना नं. १ पाणी संस्था स्थापना.
 
सन १९७४ - नागठाणे बंधारा (ता. पलूस) बांधला. परिसर सुजलाम् सुफलाम् झाला.
 
सन १९७५ - फासेपारध्यांना शिक्षण व पुनर्वसनासाठी खास प्रयत्न.
 
सन १९८१ - हुतात्मा कारख़ान्याची स्थापना. मंजुरी (दिल्लीत ११ महिने ठिय्या).
 
सन १९८३-८४ - हुतात्मा कारखान्याचा गळीत हंगाम सुरू.
 
सन २६ मे ८५ - ऐतवडे बुद्रुक येथे ५0 हजार लोकांची शेतकरी परिषद यशस्वी.
 
सन १९८५ - दुसर्‍यांदा अपक्ष आमदार म्हणून विधानसभेवर निवड.
 
सन १९८५ - सोनवडे (शिराळा) दुर्गम भागातील मुलांसाठी शाळा वसतीगृह सुरू.
 
सन १९८६ - तिसरे अखिल भारतीय दलित आदिवासी संमेलन वाळव्यात घेतले.
 
सन १९८८ - रशिया दौर्‍यासाठी पत्नी सौ. कुसुमताईंसमवेत रवाना.
 
सन १९८९ ते ९३ - दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू केल्या.
 
सन १९८९ - कराड लोकसभेसाठी उमेदवारी.
 
सन १९९0 - साखर कारखाना झोन दुरूस्ती चळवळ, सरकारला हादरा.
 
सन २५ फेब्रुवारी १९९३ - वाळवा ते सोनवडे बाबरी मशिद पाडलेबद्दल मानवी साखळी (८0 कि. मी.)
 
सन २६ मे १९९३ - किणी येथे ८0 हजार लोकांची शेतकरी परिषद.
 
सन ११ जुलै १९९३ - पासून आटपाडीत पाणी संघर्ष चळवळीला प्रारंभ.
 
सन ऑक्टोबर १९९३ - लातूर भूकंपग्रस्त १0८ मुले दत्तक.
 
सन १९९६ - कराड लोकसभा निवडणूक लढवली.
 
सन १९९८ - भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या ४ खासदारांचा सत्कार, प्रत्येकाला टाटा सुमो भेट दिल्या.
 
सन २७ मे ९९ - मुलींसाठी अद्ययावत वसतिगृह उद्घाटन (वाळवा).
 
सन ४ डिसेंबर २000 - वडाप बेरोजगारांचा कोल्हापुरात भव्य मोर्चा.
 
सन २00१ - हुतात्मा दैनिक सुरू करण्याची घोषणा.
 
सन २00८ - शिवाजी विद्यापीठाने डी.लीट. पदवी प्रदान.
 
सन २00९ - भारत सरकारचा पद्मभूषण सन्मान.
 
अण्णांचा बहुमान
 
१९९३ - नेमगोंडादादा पाटील जनसेवा पुरस्कार
 
१९९८ - डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्कार
 
१९९८ - राजर्षी शाहू महाराज पुरस्कार व मानपत्र
 
१९९९ - फुले-आंबेडकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
 
१९९९ - कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार
 
२000 - नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार
 
२000 - अरिहंत पुरस्कार
 
२00१ - प्रतिशाहू पुरस्कार
 
२00१ - क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार
 
२00२ - हरिश्‍चंद्र तारामती गौरव पुरस्कार
 
२00२ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रत्न पुरस्कार
 
२00२ - भाई माधवरावजी बागल पुरस्कार
 
२00२ - जीवन गौरव पुरस्कार कॉ. व्ही. एन. पाटील स्मृती गौरव पुरस्कार
 
२00२ - रिपब्लिकन मित्र पुरस्कार व मानचिन्ह
 
२00२ - शाहीर फरांदे पुरस्कार
 
२00२ - लक्ष्मीबाई मगर भूमिपुत्र पुरस्कार
 
२00३ - भगवान नेमिनाथ पुरस्कार
 
२00३ - महाराष्ट्र गौरव पुरस्कार (दक्षिण भारत जैनसभा)
 
२00३ - समाज भूषण पुरस्कार
 
२00४ - चिकोत्रा भूषण पुरस्कार
 
२00५ - फुले, शाहू, आंबेडकर लोकमान्य पुरस्कार
 
२00६ - आद्य क्रांतिवीर उमाजीराव नाईक पुरस्कार
 
२00६ - मणिभाई देसाई पुरस्कार
 
२00६ - लोकनेते पुरस्कार
 
२00६ - शाहू महाराज पुरस्कार
 
२00६ - लोकनेते पुरस्कार
 
२00७ - हुतात्मा गौरव पुरस्कार
 
२00७ - सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
 
२00७ - आर्य भूषण पुरस्कार
 
२00७ - राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार
 
२00७ - किसन वीर सामाजिक पुरस्कार
 
२00७ - डी. लिट्. बहुमान
 
२00९ - पद्मभूषण पुरस्कार (भारत सरकार)
 
२0११ - समाजजीवन गौरव (महाराष्ट्र फौंडेशन)
 
२0१२ - रयत माऊली पुरस्कार
 
 
==गौरव==
* भारत सरकार कडून २००९ साली [[पद्मभूषण]] पुरस्काराने गौरवण्यात आले.
* [[शिवाजी विद्यापीठ]], [[कोल्हापूर]] यांच्याकडून डी.लिट. पदवी.
==संदर्भ==
[http://www.esakal.com/esakal/20120323/5583195761680216400.htm दै.सकाळलोकमत मधील बातमी]
 
{{DEFAULTSORT:नायकवडी, नागनाथअण्णा}}