"अश्वत्थामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
संपादन गाळणी ११ ने दर्शविलेल्या काही मराठी लेखन त्रुटी सुधारल्या |
||
ओळ १:
{{विस्तार}}
कौरव आणि पांडवांचे गुरु [[द्रोणाचार्य|द्रोणाचार्यांचा]] पुत्र आणि सप्तचिरंजीवांपैकी एक. याच्या कपाळी जन्मापासूनच एक मणी असतो. अर्जुनाइतकाच शस्त्र आणि अस्त्र
अश्वत्थम्याने महाभारत युद्धात कौरावांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले. युद्धं संपल्यावर आणि दुर्योधन मृत्यूपन्थास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला "पांडवांची शिरे कापून आणतो" असे आश्वासन दिले. परंतु अंधारात पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी तो कापून आणतो. यावर संतप्त पाण्डव त्याला शोधत येतात. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रम्हास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रम्हास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्युची पत्नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतपर्यंत तू ही जखम कपाळी घेऊन दारोदार या जखमेसाठी लोकांना तेल मागत फिरशील. आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानल्या जाते.
|