"करडा (वाशिम)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
No edit summary
ओळ ३६:
गावाचे नाव करडा कसे पडले याचा काहीही संदर्भ कुठेच उपलब्ध नाही; पण पूर्वी या परिसरात सिंचनाची फारशी व्यवस्था नव्हती. मोजक्याच शेतक-यांच्या शेतात विहिरी होत्या. त्यामुळे अल्प पाण्यावर येत असलेले करडई हे पीक गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असावे. त्यावरून करडा हे नाव पडण्याची शक्यता आहे. आता करडई सोबतच कपाशी हे गावातील प्रमुख पीकही हद्दपार झाले. महाराष्ट्रात करडा हे नाव असलेले हे एकमेव गाव आहे.
== प्राचिन वस्तीचा पुरावा (काताळशिल्प)==
हे गाव जरी प्राचिन नसले तरी या परिसरात कधीकाळी मनुष्य होती याचा पुरावा गावाच्या बाहेर उत्तरेकडे असलेल्या दोन काताळशिल्पावरून मिळतो. हे काळात शिल्पकाताळशिल्प माजी सरपंच बाबाराव देशमुख यांच्या शेतात आहे. ते कधी कोरले गेले? कुणी कोरले? या बाबत कुणालाच काहीही माहिती नाही; पण हे काताळशिल्प म्हणजे थडगी असावी. कारण दोन दगडं जमिनीत पुरलेले आहेत आणि त्यावर परत जाणा-या पावलांचे ठस्से आहेत. त्यामुळे ही थडगीच असावी, याला पुष्ठी मिळते. शिवाजी ती दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीची असावी.
== धर्म ==
हिंदू आणि बौद्ध धर्मिय अधिक. सध्या गावामध्ये मुस्लिम धर्माचे केवळ एकच घर. पूर्वी गावात मुस्लिमांची सहा कुटुंबे होती; पण कालांतराने ती जवळच्याच रिसोडला स्थायिक झाली. त्यांची घरे आणि शेत जमिनी अजूनही गावामध्ये आहेत. त्यासाठी त्यांचे गावात नेहमी येणे-जाणे असते.