"दिलीप कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
दिलीप कुलकर्णी (जन्म..... ) हे लेखक,संपादक तसेच पर्यावरण आणि सामाजीकसामाजिक चळवळीत कार्यरत कार्यकर्ते आहेत.
 
==परिचय==
१९७८ मध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदविका झाले. १९७८ ते १९८४ पुण्याला टेल्को कंपनीमध्ये कार्यरत होते. १९८४ ते १९९३ विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे पूर्ण-वेळ काम. ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन केले. १९९३पासून पर्यावरणाच्या सानीध्यात जीवनशैली जगण्यासाठी कोकणातील कुडावळे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) खेडयात सहकुटुंब स्थायिक झाले.{{संदर्भ हवा}}
 
रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो.रेडिओचा अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने वापरत नाहीत.स्वत:च्यास्वतःच्या मालकीचे वाहनसुद्धा नाही
 
इ.स. १९९९ साली दिलीप कुलकर्णी नांदेडच्या ’नरहर कुरुंदकर व्याख्यानमाले’त व्याख्यान झाले.विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने, मराठी व इंग्रजीतून स्फुट लेखन.पर्यावरणाचा संदेश पोचविण्यासाठी 'गतिमान संतुलन' नावाचे मासिक चालवतात. ' निसर्गायन ', ' ग्रीन मेसेजेस ' आदीं पुस्तकांचे लेखन केले आहे.पुस्तकांप्रमाणेच भाषणांतून, कार्यशाळेमधून ते पर्यावरण संरक्षणासाठी आग्रही असतात.कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा जगविण्याचा त्यांचा प्रयत्‍न महत्त्वाचा{{संदर्भ हवा}} आहे.