"कुंति" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: hi:कुन्ती
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ३:
'''कुंति''' (देवनागरी लेखनभेद : ''कुंती'') ही [[महाभारत|महाभारतातील]] [[हस्तिनापुर|हस्तिनापुराच्या]] [[पंडु|पंडु राजाची]] पत्नी व [[पांडव|पांडवांमधील]] थोरल्या तिघांची आई होती. [[यादव|यादव कुळातील]] [[शूरसेन|शूरसेनाची]] कन्या असलेल्या कुंतीचे बालपणीचे नाव ''पृथा'' असे होते. नि:संतान असलेल्या [[कुंतिभोज]] राजाला दत्तक गेल्यावर तिचे नाव ''कुंति'' असे ठेवण्यात आले.
 
एके दिवशी कुंतिभोज राजाच्या भेटीस [[दुर्वास_ऋषि|दुर्वास ऋषी]] आले. त्यांना कुंतिभोज राजाकडेच काही दिवस निवास करायचा होता. हे ऋषी अत्यंत तापट म्हणून प्रसिद्ध होते. एखादी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे न घडल्यास ते चटकन शापवाणी उच्चारीत म्हणून कुंतिभोजाने चतुराईने कुंतिला त्यांची सेवा करण्यास सांगितले. दुर्वास ऋषींची मनोभावे सेवा केल्यामुळे त्यांनी प्रसन्न होऊन कुंतिला एका मंत्राचे वरदान दिले होते. या मंत्राची शक्ती अशी होती की तो मंत्र जपून ती ज्या देवाला आवाहन करील, तो देव तिला पुत्राचे वरदान देईल. हा मंत्र कुंतीला जेव्हा मिळाला तेव्हा ती वयाने लहान होती. उत्सुकतेने मंत्राची परिक्षा पाहाण्यासाठी तिने मंत्र जपून सूर्याला आवाहन केले. तात्काळ सूर्यदेव तिथे उपस्थित झाला व तिला एक पुत्र दिला. या पुत्राला जन्मत:च कवचकुंडले होती. या पुत्राचे नाव कुंतिने [[कर्ण|कर्ण]] असे ठेवले. परंतु अविवाहीत असताना या पुत्राला जवळ ठेवणे तिला शक्य नव्हते म्हणून कुंति एका पेटीत विपुल धन ठेवून त्यामधे या पुत्राला ठेवते व ती पेटी नदीत सोडून देते. ही पेटी अधिरथ नावाच्या कौरवांच्या सूताला सापडते. तो या पुत्राला आपल्याच पोटच्या मुलाप्रमाणे वाढवतो. त्यामुळे कर्णाला सूतपुत्र म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
 
दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्राची प्रचिती आल्यावर मात्र कुंतिने पुन्हा तो मंत्र जपत नाही. पुढे तिचा विवाह [[हस्तिनापुर|हस्तिनापूरचा]] राजा [[पांडु|पांडुशी]] याच्याशी होतो. तिला [[माद्री|माद्री]] नावाची सवत देखील होती. एकदा पांडू मृगया करताना चुकून [[किंदम_ऋषी|किंदम ऋषी]] पति-पत्नीस हरीणांची जोडी समजून बाण मारतो. मरण्यापूर्वी किंदम ऋषी पांडूला शाप देतात की जेव्हा तो एखाद्या स्त्रीजवळ शरिरसुखाच्या अपेक्षेने जाईल, तेव्हा त्याला तात्काळ मृत्यू येईल. यानंतर विफल होऊन, राज्यत्याग करून पांडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासात राहू लागतो. पुत्रप्राप्तीचा मार्ग खुंटल्याने पांडू कुंति व माद्रीला [[नियोग|नियोग]] पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेण्यास सांगतो. तेव्हा कुंतिने तिच्याकडे असलेल्या मंत्राच्या सामर्थ्याबद्दल पांडूला सांगते. पांडूने त्या मंत्राद्वारे पुत्रप्राप्ती करून घेण्यास सहमती दर्शवतो. त्याबरोबर कुंति [[यमधर्म|यमापासून]] [[युधिष्ठिर|युधिष्ठीर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम|भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन|अर्जुन]] असे तीन पुत्र प्राप्त करून घेते. आपली सवत माद्री हिलादेखील माता होण्याचा अधिकार मिळावा म्हणून कुंतिने आपला मंत्र तिला देऊन टाकते. नंतर माद्री त्या मंत्रसामर्थ्याने [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल|नकुल]] आणि [[सहदेव|सहदेव]] हे जुळे पुत्र प्राप्त करून घेते. पांडू राजाच्या या पाच पुत्रांनाच [[पांडव|पांडव]] असे म्हणतात. कुंति माद्रीच्या मुलांनाही आपल्या पोटच्या मुलांप्रमाणेच वागणूक देते.
 
पुढे शापाचा विसर पडून पांडू व माद्रीसोबत प्रणय करू पाहात असताना, त्याचा किंदम ऋषींच्या शापाच्या प्रभावाने मृत्यू होतो व त्याचे प्रायाश्चित म्हणून माद्री सति जाते. यानंतर कुंति आपल्या पाचही पुत्रांना घेऊन हस्तिनापुरास परतते. या घटनेमुळेच [[दुर्योधन|दुर्योधनाच्या]] मनात असंतोष जागा होतो.
 
[[कौरव|कौरव]] व [[पांडव|पांडव]] कुमारवयीन असताना हस्तिनापुरात युद्धकला प्रतियोगितेचे आयोजन केलेले असताना तेथे कर्णास पाहिल्यावर कुंति त्याला आपला पहिला पुत्र म्हणून ओळखते, मात्र ती याची वाच्यता कुठेही करत नाही. महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्ण जोपर्यंत कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगत नाही तोपर्यंत कुंति ही आपली माता आहे, हे कर्णालादेखील ठाऊक नसते.
 
[[द्रौपदी|द्रौपदीचा]] पाच पांडवांशी विवाह होण्यास कुंतिच्या तोंडून अनावधानाने बाहेर पडलेले शब्द कारणीभूत होतात.
 
पुढे [[महाभारत|महाभारत]] युद्धप्रसंगी एके दिवशी कुंति आपला पहिला पुत्र कर्ण यास भेटावयास जाते व त्याचा जीव वाचवण्यासाठी, त्याला पांडवांना सामिल होण्याविषयी सुचवते, मात्र कर्ण या गोष्टीस नकार देतो. या युद्धामधे कर्ण अर्जुनाकरवी मारला जातो. यानंतर कुंती कर्णाच्या जन्माचे रहस्य पांडवांना सांगते व त्याचा अंत्यविधी योग्य प्रकारे व्हावा असे आवाहन करते.
 
महाभारत युद्धसमाप्तीनंतर कुंति राजसुखाची अपेक्षा न करता [[धृतराष्ट्र|धृतराष्ट्र]] व [[गांधारी|गांधारी]] यांच्यासोबत [[वानप्रस्थाश्रम|वानप्रस्थाश्रमास]] निघून जाते.
 
{{महाभारत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंति" पासून हुडकले