"चंद्रशेखर आझाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = चंद्रशेखर आझाद
Line २६ ⟶ २५:
| तळटिपा =
}}
'''चंद्रशेखर आझाद''' उर्फ '''चंद्रशेखर सीताराम तिवारी''' ([[जुलै २३]], [[इ.स. १९०६|१९०६]] - [[फेब्रुवारी २७]], [[इ.स. १९३१|१९३१]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] एक क्रांतिकारक होते. [[राम प्रसाद बिस्मिल]] यांच्या मृत्यूनंतर त्यांनी [[हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन]] (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेचे [[हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन]] (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना [[भगत सिंग]] यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.
 
== जन्म व बालपण ==
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सद्ध्याच्या [[अलिराजपूर जिल्हा|अलिराजपूर जिल्ह्यातील]] भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पृर्वज [[कानपूर]] जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते [[वाराणसी]] येथील संस्कृत पाठशाळेत गेले. डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये [[महात्मा गांधी]] यांनी सुरू केलेल्या [[असहकार आंदोलन|असहकार आंदोलनात]] तेव्हाच्या १५वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.
 
== क्रांतिकारी आयुष्य ==
असहकार चळवळ मागे घेतली गेल्यावर ते क्रांतिकारी चळवळीकडे वळले. ते [[हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन]] मध्ये दाखल झाले.
 
== मृत्यू ==
दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, [[अलाहाबाद]] मधील [[अल्फ्रेड पार्क]] येथे 'सुखदेव राज' या क्रांतीकारी सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला व चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळिबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या मैदानाचे नाव ''चंद्रशेखर आझाद मैदान'' असे करण्यात आले.