"विनायक पांडुरंग करमरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
==जीवन==
करमरकरांचा जन्म इ.स. १८९१ साली महाराष्ट्रातील रायगड जिल्हयातील सासवणे इथे झाला. समुद्रकिनारी वसलेल्या या गावातच त्यांच्या वडिलांचा [[गणपती]]च्या मूर्ती बनवण्याचा उद्योग होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळालं. गावातील देवळाच्या भिंतीवर त्यांनी काढलेले [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] चित्र पाहून ऑटो रॉथफिल्ड या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन त्यांना [[मुंबई]]च्या [[जे. जे. स्कूल ऑफ आर्ट]]मध्ये दाखल केले.
==व्यावसायिक कारकिर्दकारकीर्द==
[[मुंबई]]च्या [[जे. जे. स्कूल ऑफ आर्ट]]मध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी [[कोलकाता| कलकत्ता]] इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्या काळात त्यांनी [[रवींद्रनाथ टागोर]], [[चित्तरंजनदास]], [[महात्मा गांधी]], [[पी.सी. रे]] प्रभृतींची [[व्यक्तिशिल्प|व्यक्तिशिल्पे]] घडवली. त्यानंतर 'लंडन रॉयल अ‍ॅकेडमी'मध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना [[इटली]], [[फ्रान्स]], [[स्वित्झरलंड]] या देशांमधील कलाकृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच ब्राँझ कटिंग, 'स्टोन क्रशिंग' ही तंत्रेही आत्मसात करून १९२३ साली ते कलकत्यास परतले.
===व्यावसायिक यश===
इ.स. १९२४ साली कलकत्यातील ईडन गार्डनमध्ये 'सोसायटी ऑफ आर्टिस्ट्‍स'च्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात करमरकरांची 'शंखध्वनी' ही कलाकृती प्रदर्शित झाली आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे त्यांनी मुंबईत [[देवनार]]ला स्टुडिओ उभारला. याच काळात [[पुणे|पुण्यातील]] 'मिलिटरी स्कूल' मधील छत्रपती महाराजांचा अश्र्वारुढ एकसंध 'पुतळा' [[ब्रॉन्झ]]मध्ये बनवायची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आणि त्यासाठी १९२५ साली ते मुंबईत आले. त्यानंतर मुंबईतच त्यांचे वास्तव्य कायम राहिले. 'एका पुतळयाची आत्मकथा' या आपल्या लेखात या अवाढव्य पुतळयाच्या निर्मितीची पूर्ण कहाणी करमरकरांनी वर्णन केली आहे. या आठ टन वजनाच्या आणि साडेतेरा फूट उंच पुतळयाच्या [[ओतकाम|ओतकामाचे]] कार्य मुंबईतील [[माझगाव डॉक]]मध्ये झाले. आपले सगळे तांत्रिक कौशल्य, अध्ययनशीलता, आत्मविश्र्वास पणास लावून आणि सहकाऱ्यांसमवेत अथक परिश्रम करुन त्यांनी ही शिल्पाकृती साकार केली, आणि इतका प्रचंड एकसंध पुतळा ब्रॉन्झमध्ये घडवणारे भारतातील समकालीन शिल्पकारांमधील ते पहिलेच शिल्पकार ठरले. हा पुतळा रेल्वे वॅगनमधून पुण्यात नेला गेला व १९२८ साली त्यांची स्थापना झाली. या स्मारकशिल्पामुळे करमरकरांची अग्रगण्य शिल्पकारांमध्ये गणना होऊ लागली.
ओळ ३८:
 
'नानासाहेब' या आदरार्थी संबोधनाने परिचित असलेल्या करमरकरांचे कौशल्य लक्षात घेऊन १९४९ साली त्यांना अमेरिकेच्या विस्कान्सिन विश्र्वविद्यालयात प्रात्यक्षिकाकरिता निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या शिल्पकलेतील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने १९६२ साली त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले. तसेच १९६४ साली [[ललित कला अकादमी]] ने त्यांना फेलोशिप देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
१९३० च्या दशकात रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीजवळील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचीपुतळाही निर्मितीहीकरमरकरांनी त्यांनीबनवला केली होतीहोता.
या थोर शिल्पकाराचे १९६६ साली म्हणजे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.
 
==करमरकर शिल्पालय==
अलिबाग ते मांडवा रस्त्यावर आवास फाट्यापासून तीन किमी अंतरावर नानासाहेब करमरकर शिल्पालय आहे. हे सासवणे गावात आहे. येथे सुमारे दोनशे कलाकृती आहेत.