"विनायक पांडुरंग करमरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ २७:
'''विनायक पांडुरंग करमरकर''', ऊर्फ '''नानासाहेब करमरकर''', ([[ऑक्टोबर २]], [[इ.स. १८९१]]; सासवणे, [[रायगड जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[जून १३]], [[इ.स. १९६७]]) हे [[मराठी]] शिल्पकार होते. [[मुंबई]]च्या [[सर जे.जे. कला विद्यालय|सर जे.जे. कला विद्यालयात]] ते शिल्पकला शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६२ साली त्यांना [[पद्मश्री पुरस्कार]] देऊन गौरवले.
 
भारतातील वास्तववादी शिल्पकारांमधील अग्रगण्य शिल्पकार म्हणून महाराष्ट्र्रातील नानासाहेब र्ऊफ विनायक पांडुरंग करमरकर ख्यातनाम आहेत. अश्र्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझमधील साडेतेरा फुट उंचीचा भव्य पुतळा घडवून असा एकसंघ पुतळा घडवणारे ते भारतातील पहिले शिल्पकार ठरले. सजीवता आणि सादृश्यता ही त्यांच्या शिल्पातील विशेष वैशिष्टयं मानली जातात.
 
करमरकरांचा जन्म इ.स. १८९१ साली महाराष्ट्र्रातील रायगड जिल्हयातील सासवणे इथे झाला. समुद्रकिनारी वसलेल्या या गावातच त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा उद्योग होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळालं. गावातील देवळाच्या भाषांतरांवरूनंिातीवर त्यांनी काढलेलं शिवाजी महाराजांचं चित्र पाहून ऑटो रॉथफिल्ड या तत्कालीन जिल्हाधिकार्‍याने पुढाकार घेऊन त्यांना मंुबईच्या जे. जे. स्कूल ऑफ र्आट मध्ये दाखल केलं. तिथे चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी कोलकता इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकीर्दीला सुरुवात केली. त्या काळात त्यांनी रवींद्रनाथ टागोर, चित्ता रंजनदास, महात्मा गांधी, पी.सी. रे प्रभृतींची व्यक्ितशिल्पं घडवली. त्यानंतर 'लंडन रॉयल अ‍ॅकेडमी' मध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना इटली, फ्रान्स, स्वित्झरलॅंड मधील कलाकृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच ब्राँझ कटिंग, 'स्टोन क्रशिंग' ही तंत्रंही आत्मसात करुन १९२३ साली ते कोलकत्यात परतले.
 
इ.स. १९२४ साली कोलकतातील इडन गार्डन मध्ये 'सोसायटी ऑफ आर्टिस्ट'च्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात त्यांची 'शंखध्वनी' ही कलाकृती प्रदर्शित झाली आणि त्यांच्या यशस्वी कारकीर्दीला सुरुवात झाली. याच काळात पुण्यातील 'मिलिटरी स्कूल' मधील छत्रपती महाराजांचा अश्र्वारुढ एकसंध 'पुतळा' ब्राॅंझमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आणि त्यासाठी १९२५ साली ते मुंबईत आले. त्यानंतर मुंबईतच त्यांचं वास्तव्य कायम राहिलं. 'एका पुतळयाची आत्मकथा' या आपल्या लेखात या अवाढव्य पुतळयाच्या निर्मितीची पूर्ण कहाणी करमरकरांनी वर्णन केली आहे. या आठ टन वजनाच्या आणि साडेतेरा फूट उंच पुतळयाच्या ओतकामाचं कार्य मुंबईतील माझगाव डॉकमध्ये झालं. आपलं सगळं तांत्रिक कौशल्य. अध्ययन शीलता, आत्मविश्र्वास पणास लावून आणि सहकार्‍यांसमवेत अथक परिश्रम करुन त्यांनी ही शिल्पकृती साकार केली आणि इतका प्रचंड एकसंध पुतळा ब्राॅंझमध्ये घडवणारे भारतातील समकालीन शिल्पकारांमधील ते पहिलेच शिल्पकार ठरले. हा पुतळा रेल्वे वॅगनमधून पुण्यात नेला गेला व १९२८ साली त्यांची स्थापना झाली. या स्मारकशिल्पामुळे करमरकरांची अग्रगण्य शिल्पकारांमध्ये गणना होऊ लागली.
 
या संस्मरणीय कामगिरीनंतर अनेक उत्तमोज्ञ्ल्त्;ाम कलाकृती घडवल्या. 'मत्सगंधा', विठ्ठलभाई पटेलांचा पूर्णाकृती पुतळा' आचार्य कृपलानी', ऑटो रॉथफिल्ड' यांच्या पुतळयांचा त्यांची 'मोरु' ,'प्रवासी', नमस्ते' आदी शिल्पही लक्षणीय ठरली. याव्यतिरिक्त करमरकरांनी भारतातील अनेक संस्थानिक व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींचीही शिल्पं घडवली.
 
'नानासाहेब' या आदरार्थी संबोधनाने परिचित असलेल्या करमरकरांचं कौशल्य लक्षात घेऊन १९४९ साली त्यांना अमेरिकेच्या विस्कान्सिन विश्र्वविद्यालयात प्रात्यक्षिकाकरिता निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या शिल्पकलेतील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने १९६२ साली त्यांना 'पद्मश्री' किताबाने सन्मानित केलं. तसेच १९६४ साली 'ललित कला' अकादमी ने त्यांना फेलोशिप देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
 
या थोर शिल्पकाराचं १९६६ साली म्हणजे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं.
 
{{DEFAULTSORT:करमरकर,विनायक पांडुरंग}}