[[दक्षिण]] [[भारत|भारतातील]] [[हंपी]] येथे [[राजधानी]] असलेले विजयनगर साम्राज्य हे एक महत्वाचेमहत्त्वाचे राज्यकर्ते होय. [[कृष्णदेवराया]] हा [[राजा]] याच वंशातला आहे. [[वरंगळ]]च्या दोन हरिहर व बुक्क या भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली. हे पाच भाऊ होते. या भावांपैकी तिघे पूर्व किनार्यावरीलकिनाऱ्यावरील नेल्लोर ते पश्चिम किनार्यावरचेकिनाऱ्यावरचे बेळगाव येथे राज्य कतरत होते. होते. महाराष्ट्र हा हरिहर च्या अंमलाखाली होता. दुसरा भाऊ होता कंप. याचे उदयगिरीराज्य नावाचे राज्य होते. मधला भाऊ बुक्क च्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. अजून दक्षिणेकडे शिमोगाजवळ अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार होता. इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे यांचे ध्यय होते. यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले साम्राज्य उभे केले होते.
बुक्करायाचा कम्पराय नावाच मुलगा होता. त्याने वीरबल्लाळचे मदूरा काबीज केले. हा कम्परायही बुक्कप्रमाणे मोठा शूर व कर्तबगार होता त्याच्या कारकीर्दीत त्याने दाखवलेल्या कर्तबगारीची वर्णने त्याच्या पत्नीने लिहिलेल्या एका “कम्पराजविजयम” या [[संस्कृत]] काव्यग्रंथात याचे उल्लेख आढळतात. त्याने बुक्कराय राजाच्या मृत्यूनंतर दूसरा हरिहर असे नाव धारण करून स्वत:लास्वतःला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषीत केले.