"जे. कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
SantoshBot (चर्चा | योगदान) छो r2.7.3) (संतोष दहिवळने वाढविले: ar, bg, bo, bs, ca, cs, da, de, en, eo, es, et, fa, fi, fr, fy, he, hi, hr, hu, id, it, ja, ko, ml, mn, my, nl, no, pl, pt, ro, ru, sh, sk, sr, sv, ta, te, tr, uk, vi, zh, zh-classical |
No edit summary |
||
ओळ ७:
कृषणमूर्तींचे अनुयायी ना-नफा तत्त्वावर [[भारत]], [[इंग्लंड]] आणि अमेरिकेत त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर आधारित अनेक स्वतंत्र शाळा चालवीत आहेत. विविध भाषांमध्ये विविध माध्यमांच्या वापरातून कृष्णमूर्तींचे विचार, भाषणे व साहित्य प्रसारित करण्याचा प्रयत्नही त्यांचे समर्थक करीत आहेत.
==कौटुंबिक पार्श्वभूमी आणि बालपण==
कृष्णमूर्तींचा जन्म ११ मे १८९५ रोजी तत्कालीन [[मद्रास]] प्रांतातील (आताच्या आंध्र प्रदेशातील [[चित्तूर]] जिल्हा) मदनपल्ले या छोट्या नगरात तेलुगूभाषिक कुटुंबात झाला. आठवा मुलगा झाला तर कृष्णाचे नाव त्याला द्यायचे या [[हिंदू]] प्रथेनुसार कृष्णमूर्ती हे नाव ठेवण्यात आले. जिद्दू हे कुलनाम. कृष्णमूर्तींचे वडील जिद्दू नारायणैया हे वासाहतिक ब्रिटिश प्रशासनाच्या सेवेत होते. संजीवम्मा या आपल्या आईचा कृष्णमूर्तींना लळा होता पण ते दहा वर्षांचे असताना संजीवम्मांचा मृत्यू झाला. नारायणैया-संजीवम्मा या दांपत्याला एकूण अकरा अपत्ये झाली, त्यांपैकी पाच जणांचा बालपणातच मृत्यू झाला.
इ. स. १९०३ मध्ये जिद्दू कुटुंब [[कडप्पा]] इथे स्थिर झाले. त्याआधीच कृष्णमूर्तींना [[हिवताप]] जडलेला होता. अनेक वर्षांपर्यंत त्यांना हिवतापाच्या उद्रेकाचा सामना करावा लागला. संवेदनशील, आजारी, स्वप्नांच्या दुनियेत असणारे हे बालक मतिमंद आहे असे सर्वांना वाटे आणि त्यामुळे शाळेत शिक्षकांचा तर घरी वडिलांचा मार नियमितपणे कृष्णमूर्तींना खावा लागे. अठरा वर्षांचे असताना लिहिलेल्या आपल्या आठवणींमध्ये त्यांनी १९०४ मध्ये मृत्यू पावलेली आपली बहीण व १९०५ मध्ये मृत्यू पावलेली आपली आई "दिसली" अशा परामानसी अनुभवांचे केलेले आहे. बालपणातच निसर्गाशी त्यांचे भक्कम बंध जुळले आणि हे बंध आयुष्यभर टिकले.
१९०७ मध्ये ब्रिटिशांच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जिद्दू नारायणैया यांनी अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटीत नोकरी धरली. रुढीप्रिय [[ब्राह्मण]] असण्याबरोबरच नारायणैया १८८२ पासून थिऑसॉफिस्टही होते. जानेवारी १९०९ मध्ये जिद्दू कुटुंब अड्यारला आले. थिऑसॉफिकल कुंपणाच्या बाहेर असलेल्या अस्वच्छ झोपडीत नारायणैया व त्यांचे पुत्र राहू लागले. सभोवतालच्या खराब परिस्थितीमुळे हे पुत्र कुपोषित बनले, त्यांना उवांचाही त्रास होऊ लागला.
{{विस्तार}}
|