"अगस्त्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: वार्तांकनशैली ? |
No edit summary खूणपताका: वार्तांकनशैली ? |
||
ओळ १:
{{हा लेख|अगस्त्य किंवा अगस्ती
[[चित्र:WLA lacma 12th century Maharishi Agastya.jpg|thumb|right|200px|अगस्त्याचे शिल्प]]
'''अगस्त्य महर्षी''' (नामभेद: '''अगस्त्य''', '''मैत्रावरुणि''', '''अगस्ति'''
= दक्षिणदिशेस प्रस्थान =
देवतागणांच्या विनंतीस मान देवून महर्षींनी काशीग्राम सोडून दक्षिणदिशेस प्रस्थान केले आणि नंतर ते दक्षिणेतच स्थायिक झाले. भगवान श्री अगस्त्य महर्षी हे [[आर्यावर्त|आर्यावर्ताच्या]] दक्षिणेकडील भूप्रदेशात आर्यांच्या वसाहतीकरणाची सुरुवात करणारे आद्य वसाहतकार होते, असे मानले जाते. जगप्रसिद्ध ऐतिहासिक महाकाव्ये [[रामायण]] तथा [[महाभारत]] ह्या दोहोंमध्ये महर्षींच्या आयुष्यातील प्रसंगांबद्दल विस्मयकारक आख्यायिका आढळतात. रामायणामध्ये त्रेतायुगात [[राम|प्रभू रामचंद्र]], [[सीता]] आणि [[लक्ष्मण]] वनवासाच्या काळांत वनांत हिंडत असतांना [[नाशिक|नाशिकजवळ]] महर्षींच्या आश्रमात आले आणि त्यांना भेटले अशी एक कथा आहे. त्यावेळी महर्षींनी प्रभु रामचंद्रास ‘विरजा’ नामक शैवदीक्षा दिली, तसेच दक्षिणेत जावून लंकापती [[रावण|रावणाचा]] अत्याचार दूर करावयास सुचविले. एवढेच नव्हे तर लंकापतीस वश करून त्याचा अंत करण्याच्या हेतुपूर्तीसाठी अजोड, अमोघ शस्त्रास्त्रांसह कधीही समाप्त न होणार्या बाणांचा भाता दिला. त्यांनीच भगवान प्रभु रामचंद्रास लंकागमनापूर्वी
= समुद्रप्राशन, वातापि-इल्वलमर्दन तथा विंध्यपर्वताच्या कथा =
महाभारतात भगवान श्री अगस्त्य महर्षींनी केलेल्या समुद्रप्राशनाची कथा आहे. देवासुरयुद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेले [[कालकेय]] दानव हे समुद्राच्या तळाशी जावून लपल्यावर महर्षींनी अख्खा समुद्र पिऊन कालकेयांना ठार मारले आणि देवांवरील संकट निवारले. याबरोबरच त्यांनी नहुषाच्या शापाने विषसर्पस्वरूप झालेल्या [[वातापि]] नामक महादैत्यास भक्षून आपल्या जठराग्नीने पचवून; त्याचा सहोदर [[इल्वल]] ह्यास नेत्राग्नीद्वारा भस्मीकृत केले अशीही कथा आहे. भगवान श्री अगस्त्य महर्षी हे [[विंध्य पर्वत| विंध्य पर्वताचे]] गुरू असल्याचा उल्लेख महाभारतात अन्यत्र आहे. प्राचीन काळी [[मेरु पर्वत]] हा सार्या पर्वतांमध्ये उत्तुंग पर्वत म्हणून मान्यताप्राप्त होता. ह्याची उत्तुंगशिखरे पाहून ईर्ष्येने विंध्य पर्वत स्वत:ची उंची मेरु पर्वतापेक्षा अधिक करण्याकरिता वाढवू लागला. ह्यामुळे [[पृथ्वी|पृथ्वीच्या]] सूर्यगमनामध्ये बाधा येवून काळगणनेमध्ये अंतर पडू लागले. उंचीने सतत वाढत असल्यामुळे विंध्यास गर्व झाला. तेंव्हा देवतांनी एकत्र येवून महर्षींना ‘काहीतरी करा परंतु ह्यातून सोडवा’ अशी प्रार्थना केली. महर्षी दक्षिण दिशेस गमन करीत असतांना विंध्य पर्वत त्यांस आडवा आला. गुरुतुल्य महर्षींच्या अद्भुत सिद्धी मनोमन जाणून विंध्य पर्वत त्यांच्यापुढे नमला आणि महर्षींच्या दक्षिणदिग्विजयासाठी त्याने त्यांना मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर महर्षींनी त्यास स्वत: पुनः उत्तर दिशेस परतेस्तोवर जैसा आहे तैसा असण्याची आज्ञा केली. परंतु महर्षी दक्षिणेकडून न परतल्यामुळे विंध्य नेहमीसाठीच विनतावस्थेत राहिला आणि त्याकारणे आर्यावर्ताचा दक्षिणदेशाशी संपर्क स्थापन होवू शकला.
= विवाह =
[[मनुस्मृति|मनुस्मृतिच्या]] कथनानुसार सार्या [[हिंदु|हिंदुंप्रमाणे]] महर्षींनासुद्धा विवाह करून संततीजनन करण्याची वेळ प्राप्त झाली तेंव्हा घनकीर्तिप्राप्त [[विदर्भ|विदर्भराज]] निमी ह्याची कन्या [[लोपामुद्रा]] ही युक्त वयास प्राप्त झाल्यावर त्यांनी तिच्याशी विवाह करण्यासंबंधी विदर्भराजास विनंती केली. प्रथमत: एका विरागी मनुष्याकडून हे प्रतिपादन ऐकून विदर्भराज खिन्न झाला. परंतु भगवान श्री अगस्त्य महर्षींचे प्रतिभाशाली व्यक्तित्व देखून त्याने ह्या विवाहास मान्यता देवून महर्षींचा लोपामुद्रेशी विवाह लावून दिला. पुढे ह्या दंपतींस [[दृढस्यु]] नावाचा पुत्र झाला. महर्षींच्या लोकोत्तर कार्यामध्ये त्यांची पत्नी लोपामुद्रा ह्यांनीदेखील स्वतंत्र बुद्धीमत्तेने साथ दिल्याचे पुराणांमध्ये आढळते.
= ग्रंथनिर्मिती =
[[तमिळ|तमिऴ]] साहित्यामध्ये अनेक अगस्त्यांच्याबद्दल उल्लेख आढळत असला, तरी ज्यांस [[वैद्यशास्त्र]] तथा [[ज्योतिषशास्त्र|ज्योतिषशास्त्राचे]] आचार्य म्हणून आराधिले जाते, ते कुंभोद्भवन् ह्याही नांवाने प्रख्यात असलेले भगवान श्री अगस्त्य महर्षीच होत. दाक्षिणात्य सिद्ध औषध चिकित्सापद्धतीचे जनक म्हणून देखील ते मान्यताप्राप्त आहेत. [[आयुर्वेद|आयुर्वेदीय औषधांवर]] अभ्यास करून ‘अगस्त्यरसायनम्’ नामक ग्रंथही त्यांनी लिहिला. [[विश्वकर्मा|विश्वकर्म्याने]] त्याचा ग्रंथ ज्या ग्रंथावर आधारल्याचे मानले जाते तो ‘अगस्त्यकलाधिकारम्’ हा [[स्थापत्यशास्त्र|स्थापत्यशास्त्रावर]] महर्षींनी लिहिलेला ग्रंथ प्रचलित आहे. त्यासह नौकाशास्त्राची उत्पत्ती करवून पहिल्यावहिल्या होडीचा शोध महर्षींनी लावला असे मानले जाते. त्यांनी देशोदेशी भ्रमण करून अनेक नवीन प्रांत शोधून काढले. त्यांनी [[संस्कृत|संस्कृतमध्ये]] रचलेले ‘रत्नशास्त्रम्’ देखील उपलब्ध आहे, ज्यात रत्नाची उत्पत्ती तथा लक्षण, गुण आणि परीक्षा करण्याच्या विधीविधानांचे वर्णन आहे. त्यांनी रचलेल्या ‘अगस्त्यसंहिता’ नामक ग्रंथांत [[विष्णु|विष्णुपूजन]] करावयाची रीति दर्शावणारे शास्त्र आहे. त्यांनीच ‘श्रीललितासहस्त्रकम्’ स्तोत्राची रचनाही केली. १२,००० सूत्र समाविष्ट असलेला ‘अगस्त्यम्’ हा विश्रुत ग्रन्थ महर्षींनी रचला. [[वराहपुराण|वराहपुराणातील]] ‘अगस्त्यगीत’, पञ्चरात्रम् तथा [[स्कन्दपुराण|स्कन्दपुराणातील]] ‘अगस्त्यसंहिता’ पासून विविध पुराणांच्या भागांमध्ये महर्षींचे कर्तृत्त्व उल्लेखित असल्याचे दिसते. महर्षींनी एकूण ९६ ग्रंथांची निर्मिती केल्याचे मानले जाते. यातील अनेक ग्रंथ प्रस्तुत काळीं अपूर्ण स्थितीमध्ये का होईना, उपलब्ध आहेत.
= जीवनकार्य =
महाभारतातील शांतिपर्वात त्यांनी गायलेली विद्या
= तमिऴ भाषेचे जनक =
भगवान श्री अगस्त्य महर्षी ह्यांनीच [[तमिळ|तमिऴभाषेची]] अक्षरमाला निर्मिली, ह्याकारणे ते तमिऴ भाषेचे जनक मानले जातात. त्यासह ते तमिऴ भाषेचे आद्य वैयाकरणीही होत असा विश्वास आहे. प्रसिद्ध तमिऴ व्याकरणपर ग्रंथ ‘तॊल्क्काप्पियम्’ ज्यांनी रचले, ते ‘तॊल्क्काप्यर् मुनी’ हे महर्षींचेच प्रथमशिष्य होत. संस्कृतभाषेच्या तोडीस तोड ज्ञानभाषा म्हणून तमिऴभाषेला मान्यता प्राप्त होण्यात महर्षींनी स्वत: पुढाकार घेवून तमिऴभाषेत निर्मिलेली विपुल ग्रंथसंपदा ही मुख्यत: कारणीभूत ठरावी. दक्षिणेकडे निसर्गत:च भरपूर प्रमाणांत उपलब्ध असलेल्या ताडाच्या झाडांच्या पत्रांची उपयुक्तता जाणून, त्यांवर कोरून लेखन करण्याच्या कलेचा शोध त्यांनी ज्ञानविद्या दीर्घकाळ टिकण्याच्याच उद्देशाने लावला. दूरदृष्टीने ताडपत्र्यांच्या केलेल्या ह्या उपयोजनाचा प्रभाव शतकानुशतके टिकून राहिला असून पुरातन काळांतील अशी अनेक हस्तलिखिते आजही दक्षिण भारतांत आढळतात.
= नाडीग्रंथशास्त्राची निर्मिती =
उपरोल्लेखित अनेक सर्वगुणांसह महर्षी स्वत: एक उत्तम तत्त्ववेत्ता देखील होते. तत्त्वज्ञान आणि ज्योतिषशास्त्र ह्यांच्या सुरेख संगमातून त्यांनी [[नाडी_ज्योतिष|नाडीग्रंथशास्त्राची]] निर्मिती केली. आध्यात्मिक योगशक्तीबळाने दूरवरील भविष्यकाळाचा वेध घेवून त्या येणार्या काळांतील मनुष्यप्राण्याचे जीवन सुसह्य व्हावे, आगामी समाजाने परब्रह्मस्वरूप कर्मविपाकसिद्धांताची कास सोडता कामा नये ह्यासाठी त्रिकालदर्शी भगवान श्री अगस्त्य महर्षींनी नाडीग्रंथरचना केली. ह्या कार्यात त्यांच्यासारख्याच इतरही अनेक महर्षींनी हातभार लावला. ह्या सार्यांनी आपल्या आध्यात्मिक योगशक्तीबळाच्या सहाय्याने मानवी बुद्धीच्या मर्य्यादा ओलांडून आकाशस्थित ज्ञानभांडारातून आगामी काळांतील अनेकांची जीवन चित्रे न्याहाळून काव्यबद्ध स्वरूपात नोंदवून ठेवली. ईश्वरी प्रेरणेने त्यांचे जीवनकार्य घडतांना त्यांच्या आयुष्यातील छोटेमोठे प्रश्न सुटावेत ह्यासाठी वडीलकीच्या प्रेमळ नात्याने शांतीदीक्षेसारखे उपाय नाडीग्रंथलेखन करून सुचवले. ह्या सार्या विस्तृतकार्याचा आरंभ त्रिकालदर्शी भगवान श्री अगस्त्य महर्षींनी केला.
= विविध स्थळे =
भारतवर्षात तसेच इतरत्रदेखील, अगस्त्यकूट, अगस्त्यपुरम्, अगस्त्यतीर्थम्, अगस्त्यगिरि, अगस्त्यवटम्, अगस्त्यसरस्स्, अगस्त्याश्रमम्, अगस्तीश्वरम् ह्यासारखी ह्या महर्षींच्या नांवाने आरंभ होणारी विविध स्थळांची नांवे ही त्यांच्या चतुरस्त्र चरित्ररेखेची साक्ष देणारी ठरावीत. महर्षींचे भारतवर्षामध्ये अनेक आश्रम आहेत. त्यातील काही मुख्य आश्रम उत्तराखण्ड (रुद्रप्रयाग जिल्हा, अगस्त्यमुनी शहर), महाराष्ट्र (नागपूर जिल्हा तसेच संगमनेरजवळ प्रवरानदीच्या काठावर अकोले येथे), आंध्रप्रदेश (तिरुपती), तमिऴनाडू (चेन्नैजवळ अगस्त्यकूट पर्वतावर) ह्या ठिकाणी आहेत. त्यासह [[इंडोनेशिया]], [[जावा]], [[सुमात्रा]] इत्यादि ठिकाणीही ह्यांचे पूजन केले जाते. आकाशाच्या ईशान्य कोणांत उगवणारा तारा कॅनोपस् (Canopus) हा पौरस्त्य ज्योतिषशास्त्रात ‘अगस्त्य नक्षत्र’ म्हणून गणला जातो, हा भगवान श्री अगस्त्य महर्षींच्या चतुरस्त्र चरित्ररेखेचा गौरवच आहे!
== संदर्भ ==
|