"ओशो" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ४५:
नंतरच्या काळातही आश्रमातील रहिवाशांकडून मादक द्रव्यांचा वापर, वेश्याव्यवसायासारखे प्रकार यांमुळे हा आश्रम वादग्रस्तच राहिला.
सत्तरीच्या दशकाच्या अखेरीस हा आश्रम ओशोंना अपुरा वाटू लागला आणि पर्यायी जागेसाठी चाचपणी सुरू झाली. आश्रम हलविण्याचे त्यांचा मानस कधीच प्रत्यक्षात उतरू शकला नाही. [[मोरारजी देसाई]] यांचे [[जनता पक्ष]] सरकार आणि आश्रमातील तणावाचे संबंध त्यासाठी कारणीभूत ठरले. भूमी-वापराची मान्यता रद्द केली गेली आणि पूना आश्रम हे मुख्य गंतव्यस्थान दाखविणाऱ्या परदेशी अभ्यागतांना प्रवेशपत्र देणे सरकारने बंद केले. देसाई सरकारने पूर्वलक्ष्यी प्रभावाने आश्रमाची कर-सवलत रद्द केली आणि अंदाजे पन्नास लाख रुपयांचा बोजा आश्रमावर पडला. विविध धार्मिक नेत्यांशी ओशोंचे असलेले मतभेदही आश्रम-स्थलांतराच्या आड आले.
सन १९८१ पर्यंत ओशो आश्रमास दरवर्षी सुमारे ३०,००० पाहुणे भेट देत होते. रोजच्या व्याख्यानांमध्ये तेव्हा मोठ्या संख्येने युरोपीय आणि अमेरिकी असत. सत्तरीच्या अखेरीस ओशोंची व्याख्यानशैलीही बदलल्याचे निरीक्षण अनेकांनी मांडले आहे. बौद्धिक बाबींवर कमी भर आणि श्रोत्यांना धक्का देण्यासाठी किंवा त्यांच्या रंजनासाठी अनौपचारिक विनोद जास्त भर असे व्याख्यानांचे स्वरूप झाले होते. सुमारे १५ वर्षांच्या व्याख्यानांनंतर १० एप्रिल १९८१ रोजी ओशोंनी सार्वजनिक मौन स्वीकारले. ते सुमारे साडेतीन वर्षे कायम राहिले. व्याख्यानांची जागा सत्संगाने घेतली. त्यात संगीतमय वातावरणात शांतपणे बसणे आणि [[खलिल जिब्रान]]चे ''द प्रॉफेट'' किंवा ''इशोपनिषद'' वाचणे अशा बाबींचा समावेश होता. याच काळात मा आनंद शीला (शीला सिल्वरमन) ह्या ओशोंच्या सचिव बनल्या.
|