"विनायक लक्ष्मण भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
 
 
'''{{लेखनाव}}''' (जन्म : पळस्पे(कोंकण), [[नोव्हेंबर ६]], [[इ.स. १८७१|१८७१]] - मृत्यू : पुणे, [[सप्टेंबर १२]], [[इ.स. १९२६|१९२६]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक होते.
 
त्यांचे बालपण, शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या [[जनार्दन बाळाजी मोडक]] या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच विनायक लक्ष्मण भावे यांनी १ जून १८९३ रोजी ठाण्याच्या [[मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे)|मराठी ग्रंथसंग्रहालयाची]] स्थापना केली.
 
इ.स. १८८७मध्ये मॅट्रिकच्या वर्गात असलेल्या विनायकला त्यांच्या वकील असलेल्या वडिलांनी इतिहासाचे पुस्तक विकत आणून दिले नाही. इतिहासाच्या पुस्तकाला महाग झालेल्या या मुलाने वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी, १ जून १८९३ रोजी या ग्रंथालयाची निर्मिती केली. १८९५मध्ये भावे मुंबईतून बी.एस्‌सी. झाले. नंतर त्यांनी अनेक वर्षे मिठागरे चालवण्याचा व्यवसाय केला.
 
==लेखन==
इ.स. १८९८पासून वि.ल.भावे यांनी सार्वजनिकरीत्या लेखनास सुरुवात केली. त्यांचा पहिला वाङ्‌मयाच्या इतिहासासंबंधीइतिहासासंबंधीचा ९८ पानी निबंध, ‘ग्रंथमाला’ या मासिकातून १८९८-१८९९ या कालावधीत प्रकाशित झाला. या निबंधात पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्‌मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे.
 
वि.ल.भावे यांनी १९०३ साली महाराष्ट्र कवि हे मासिक काढले. त्या मासिकातून भावे यांनी [[दासोपंत]], सामराज, नागेश आदी कवींचे जुने ग्रंथ संशोधित स्वरूपात प्रसिद्ध केले. इ.स.१९०७साली महाराष्ट्र कवि बंद पडले, पण त्यानंतर [[महानुभाव|महानुभावांच्या]] सांकेतिक लेखनाची(सकळ आणि सुंदरी या गुप्त लिप्यांची) किल्ली हस्तगत करून त्यांनी [[महानुभाव|महानुभावांच्या]] पोथ्या बाळबोध लिपीत प्रकाशित केल्या.
[[महाराष्ट्र सारस्वत|महाराष्ट्र सारस्वताच्या]] दुसऱ्या आवृत्तीत(इ.स.१९१९) वि.ल.भावे यांनी [[महानुभाव]] पंथ आणि त्यांचे वाङ्‌मय यांचा परिचय करून दिला. त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या प्रकाशनासाठी ‘मराठी दप्तर’ नावाची संशोधन संस्था काढली. त्या संस्थेतर्फे त्यांनी १९१७ व १९२२ साली दोन ‘रुमाल’ प्रसिद्ध केले. अज्ञानदासाच्या [[अफझलखान|अफजलखानाचा]] पोवाड्यातील ऐतिहासिक प्रसंगावर एक ५३ पानी निबंध लिहून प्रकाशित केला. त्यांनी ‘विद्यमान’ नावाचे मासिकही काढले होते.
 
[[महाराष्ट्र सारस्वत]] हा वि.ल.भावे यांचा ग्रंथ इतका गाजला की ते महाराष्ट्र सारस्वतकार म्हणून ओळखले जातात. [[नेपोलियन|नेपोलियनचे]] चरित्रही त्यांनी प्रथमच मराठीत आणले. ठाण्याच्या [[मराठी ग्रंथसंग्रहालाय (ठाणे)|मराठी ग्रंथसंग्रहालयात]] त्यांचा १२ सप्टेंबर हा स्मृतिदिन आजही पाळला जातो.