"दौलतराव श्रीपतराव देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ '''बाळासाहेब देसाई''' (जन्म:10 मार्च, 1910 यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, महसूल, गृह, शिक्षण व कृषी ही मंत्रिपदे केव्हा ना केव्हा सांभाळली होती. (संदर्भ:http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=53851:2010-03-10-18-28-25&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212) प्र.के.अत्रेंनी त्यांचा गौरव लोकनेते असा केला होता.
 
 
==बालपण==
10 मार्च, 1910 रोजी त्यांचे आजोळ विहे या ठिकाणी झाला. त्यांचे गाव मरळी. ही दोन्ही गावे पाटण तालुक्यातीलच.आई दरुबाई त्यांच्या बालपणीच निधन पावल्या. त्यांचा सांभाळ मावशी पुतळाबाई यांनी केला. समोर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी परिश्रमपुर्वक मात केली. शिकून मोठे झाले पाहिजे ही इच्छाशक्तीची शिदोरी घेवून शिक्षणासाठी त्यांनी याच्या अवघ्या आठव्या वर्षी घराचा त्याग केला. परिस्थितीवर मात करताना त्यांनी चिरमुरे खावून दिवस काढले. 1925 मध्ये सातवीनंतरचे शिक्षण कोल्हापूरला घेताना संकटांना न जुमानता जेवणाचे वार लावले. काहीवेळा उपाशीपोटी राहून त्यांनी चिकाटीने दारिद्र्य सहन करत पुढचे शिक्षण घेतले. शिक्षणवेड्या बाळासाहेबांनी एक वर्षात इंग्रजी अभ्यासक्रमाच्या तीन इयत्ता पूर्ण केल्या. अन्नाअभावी वर्गात घेरी येवून पडणाऱ्या बाळासाहेबांनी बारा वर्षाच्या खडतर तपानंतर बी.ए., एलएल. बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले.
पाटण तालुक्यातील मरळी हे त्यांचे जन्मगाव. बाळासाहेब देसाई यांना बालपणी फार परिश्रम करावे लागले.
 
==व्यक्तिमत्त्व==
बाळासाहेब देसाई हे धिप्पाड शरीरयष्टीचे होते. पायघोळ धोतर, खादीचा नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी, खादीचा कोट किंवा जॅकेट, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा वेष असे.
==व्यावसायिक कारकीर्द==
1937 मध्ये बी. ए., एलएल. बी. झाल्यानंतर पाटण आणि कराड येथे त्यांनी वकिली केली.
==राजकीय कारकीर्द==
शिक्षण मंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होते
===पाटण तालूका आणि सातारा जिल्हा===
सातारा जिल्ह्याच्या जिल्हा लोकल बोर्डाच्या माध्यमातून 1940 मध्ये राजकारणात प्रवेश केला.पाटण तालुक्यातून लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले आणि तत्कालीन प्रस्थापीत ब्रिटिश सरकारमधील धनजी शहा कूपर यांचे प्रस्थ मोडून अध्यक्षपदी निवडून आले. लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदी सलग बारा वर्षे होते.
===मुंबई राज्य===
1952 मध्ये पाटण तालुक्यातून विधानसभेसाठी ते बिनविरोध निवडून गेले.1957 मध्ये पुन्हा विधानसभेवरील निवडीनंतर ते बांधकाम मंत्री झाले.
===महाराष्ट्र राज्य===
1962 मध्ये ते कृषिमंत्री झाले.1978-79 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे ते अध्यक्ष होते. (संदर्भ:http://www.dainikaikya.com/20100310/5566917271262061553.htm)
 
==उद्योग समूह==