"गोंदवलेकर महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ २९:
}}
 
== जीवन ==
 
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकीं श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) या दिवशी गोंदवले बुद्रुक या गांवी झाला. हे गांव सातारा जिल्ह्यांतील माण तालुक्यांत असून ते सातारा-पंढरपूर रस्त्यावर सातार्‍यापासून चाळीस मैलांवर आहे. त्यांचे घराण्यांत विठ्ठलभक्ति व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचार संपन्न व लौकिकवान होते. ते घरी थोडी शेती करून कुलकर्णीपणाचें काम करीत. श्रीमहाराजांचे मूळ नांव गणेश रावजी घुगरदरे. स्मरणशक्ति, चलाख बुद्धि, पुढारीपणा, निर्भय वृत्ति, एकांतप्रियता, रामनामाची आवड ह्या गोष्टी श्रीमहाराजांमध्यें लहानपणापासूनच होत्या. ते नऊ वर्षांचे असतांना गुरु शोधार्थ घर सोडून गेले. पण त्यांच्या वडिलांनी ते कोल्हापुरास आहेत असे कळल्यावर त्यांनी श्रीमहाराजांना घरी परत आणले. त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षीं लग्न करण्यांत आले, परंतु त्यांचे प्रपंचांत चित्त रमेना, आणि ते लवकरच गुरुशोधार्थ पुन्हां घर सोडून निघून गेले. त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी भेतल्या. पण त्यांच्या मनाचें समाधान झाले नाही. ते विशेषतः उत्तर भारतात गुरुशोधार्थ हिंडले. शेवटी श्रीरामदासस्वामींच्या परंपरेंतील एक थोर सत्पुरुष श्रीरामकृष्ण यांनी श्रीमहाराजांना दर्शन दिले आणि त्यांना नांदेड जवळील येहळेगांव या गावी श्रीतुकारामचैतन्य यांचेकडे जाण्याचा आदेश दिला.
==== जन्म व बालपण ====
----
 
या आदेशानुसार श्रीमहाराज श्रीतुकामाईंकडे गेले. तेथे नऊ महिने राहून त्यांनी एकनिष्ठेनें गुरुसेवा केली, आणि ते देहबुद्धिविरहित व पूर्ण ज्ञानी झाले. श्रीतुकामाईंनी त्यांचे 'ब्रह्मचैतन्य' असे नांव ठेवलें, आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली.
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म शके १७६६ माघ शुद्ध द्वादशी (१९ फेब्रुवारी १८४५) बुधवारी, सकाळी ९:३० च्या सुमारास गोंदवले बुद्रुक (तालुका [[माण]], [[सातारा जिल्हा|जिल्हा सातारा]] ) येथे झाला. त्यांचे घराण्यांत विठ्ठलभक्ति व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचारसंपन्न व सात्त्विक वृत्तीचे होते. जन्मावेळी त्यांचे नाव [[गणपती]] ठेवण्यात आले होते. श्रीब्रह्मचैतन्य प्रभू श्रीरामचंद्रांचे उपासक होते.
 
सद्‍गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्रीमहाराजांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावलें. त्यांचे शिष्य-प्रशिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र व कर्नाटकांत बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानांतही आहेत. त्यांची प्रथम पत्‍नी वारल्यानंतर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केलें. त्यांनी आपल्या घरीं आणि इतरत्र अनेक ठिकाणीं श्रीराममंदिरांची स्थापना करून उपासनेची केंद्रें निर्माण केली.
==== गुरुकृपा ====
----
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://balsanskar.com/marathi/lekh/1169.html}}
 
त्यांनी असंख्य लोकांना व्यसनें, दुराचरण, दुरभिमान, संसारचिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचनें व भजनकीर्तनें यांचा उपयोग केला. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता. त्यांनी गोरगरीबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. गोरक्षण, अन्नदान, भावी काळांत मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठानें, नामजप, भजनसप्ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावलें. आधुनिक सुशिक्षितांमधील अश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येंही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न केला. अशा रीतीनें लोकांमध्यें धर्मजागृति केली. नामस्मरण हें सर्वश्रेष्ठ साधन आहे असें त्यांनी कळकळीनें व बुद्धीला पटेल अशा रीतीनें सांगितलें. वासनारहित झालेल्या त्यांच्याकडून अनेक चमत्कार घडले हें जरी खरें, तथापि पापी लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावलें हा त्यांचा सर्वांत मोठा चमत्कार म्हणतां येईल. लोकांना नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मीलन कसें करावें हें शिकविण्यासाठीं त्यांनी आमरण खटाटोप केला, आणि मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशीं गोंदवलें मुक्कामी त्यांनी देह ठेवला.
वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी गुरूच्या शोधार्थ घर सोडले. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी [[कोल्हापूर]] येथून त्यांना परत आणले. काही काळाने त्यांनी पुन्हा गृहत्याग करून गुरुशोधार्थ भ्रमण सुरू केले. अनेक संतसत्पुरुषाच्या भेटी घेतल्या. अखेर मराठवाड्यातील [[नांदेड]]जवळ असलेल्या येहळेगावी [[श्रीतुकामाई]] यांच्याकडून त्यांना शिष्यत्व प्राप्त झाले. अतिशय कठोर अशा कसोट्या देत, गुरुआज्ञापालन करीत, त्यांनी गुरुसेवा केली. यावेळी त्यांचे वय १४ वर्षांचे होते. श्रीतुकामाईंनी त्यांना '''ब्रह्मचैतन्य''' हे नाव दिले, रामोपासना दिली आणि अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. यानंतर श्रीतुकामाईंच्या आदेशानुसार महाराजांनी बराच काळ तीर्थाटन केले.
 
==== लोकसंग्रह ====
----
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://balsanskar.com/marathi/lekh/1169.html}}
 
गृहत्यागानंतर नऊ वर्षांनी श्रीब्रह्मचैतन्य महाराज [[गोंदवले]] येथे परतले. इथून पुढचे सारे आयुष्य त्यांनी रामनामाचा प्रसार व विविध ठिकाणी राममंदिरांची स्थापना यासाठी वेचले. गुरुआज्ञेनुसार स्वतः गृहस्थाश्रमात राहून जनसामान्यांना प्रपंच करत परमार्थ कसा साधावा याचे मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत रामाचे स्मरण ठेवावे आणि त्याच्या इच्छेने प्रपंचातील सुखदुःखे भोगावीत हे त्यांच्या उपदेशाचे सार आहे. गोरक्षण व गोदान, अखंड अन्नदान, अनेक वेळा विविध कारणांनी केलेल्या तीर्थयात्रा हे महाराजांच्या चरित्राचे काही ठळक विशेष आहेत. सुष्ट आणि दुष्ट, ज्ञानी आणि अज्ञ, यांच्याबद्दल समभाव, निस्पृहता, कल्याणकारी वृत्ती, दीन अनाथांचा कळवळा, सहनशीलता, व्यवहारचातुर्य, जनप्रियत्व, रसाळ वाणी हे महाराजांचे सहजगुण आहेत. समोरची व्यक्ती कोणीही असो, ते प्रत्येकाला समजेल अशा भाषेत आणि खुबीने मार्गदर्शन करीत. सामान्यांशी ते घरगुती आणि सोप्या भाषेत संवाद साधत, तसेच वेदसंपन्न ज्ञानी मंडळींशी चर्चा करण्याचा प्रसंग आला असता त्यांनाही वैदिक कर्मांच्या जोडीने नामस्मरण करण्याची आवश्यकता पटवून देत.
 
त्यांची श्रीरामाशी असलेली अनन्यता आणि दृढ श्रद्धा त्यांच्या वागण्याबोलण्यातून सतत व्यक्त होत असे. नामस्मरण या साधनाची आजच्या युगातली थोरवी त्यांनी कळकळीनें व विविध मार्गांनी मार्मिक दाखले देऊन सांगितली. '''॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥''' या त्रयोदशाक्षरी मंत्राचे महात्म्य विषद करण्यासाठी त्यांनी [[भजन]], [[कीर्तन]], [[प्रवचन]], चर्चा, शंकासमाधान या सर्व मार्गांचा अवलंब केला. श्रीरामाच्या इच्छेखेरीज काहीही घडत नाही, आणि अखंड रामनाम जपल्यास आनंद आणि समाधान लाभते, या महाराजांच्या सांगण्याचा अनुभव त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक साधकाने घेतला आहे.
 
==== महासमाधी ====
----
 
मार्गशीर्ष वद्य दशमी, शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास गोंदवल्यास श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी देह ठेवला.
 
[[File:TukaaMaai01.jpg|thumb|<big>श्रीमहाराजांचे गुरु - [[श्रीतुकामाई]]</big>]]
Line ६२ ⟶ ४६:
 
== शिष्यपरिवार ==
 
श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचा शिष्यपरिवार सर्वदूर पसरलेला आहे. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे -