"चर्चा:संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: श्री० प्रसाद परांजपे यांनी पाठवलेला प्रतिमा जोशी यांचा महाराष्ट... |
छोNo edit summary |
||
ओळ १:
== विकीपीडियाचे मुखपत्र करू नका ==
हा लेख विकी मापदंडांना धरून नाही. या लेखात अभिनिवेष सातत्याने डोकावताना दिसतो. निखळ माहिती हे विकीचे मुख्य तत्त्व आहे. ते येथे पाळलेले दिसत नाही. अभिनिवेष असलेली काही वाक्ये पाहा :
१. महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले.
२. काँग्रेस नेते जनतेच्या नजरेतून उतरले.
२. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात, मला नेहरु महत्त्वाचे वाटतात असे म्हटले.
३. संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्याचा खरपूस समाचार घेतला.
४. मोरारजी देसाई व स.का.पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली.
५. गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल' अशी मुक्ताफळं उधळली.
६. लोकांनी संतापून सभा उधळली.
अशी आणखी अनेक वाक्ये या लेखात आहेत. ही वाक्ये दै. सामना वा अन्य एखाद्या मुखपत्रातील लेखासारखी वाटतात. अशी वाक्ये विकीपिडियाच्या लेखात योग्य नव्हेत. विकीपीडिया कोणत्याही विचारांचे मुखपत्र नाही, हे येथे समजून घेणे आवश्यक आहे. या लेखात योग्य ती संपादने करावीत, असे सर्वसंबंधितांना सूचवावेसे वाटते.
आपला<br />
[[सूर्यकांत पळसकर]]
........................................
श्री० प्रसाद परांजपे यांनी पाठवलेला प्रतिमा जोशी यांचा महाराष्ट्र टाईम्स (५ मे २०१०) मधील लेख खालीलप्रमाणे.
|