"अरविंद घोष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: or:ଶ୍ରୀ ଅରବିନ୍ଦ खूणपताका: अमराठी योगदान |
छोNo edit summary |
||
ओळ ४:
[[चित्र:Sri aurobindo.jpg|240px|thumb|upright|right|श्री ऑरोबिंदो]]
[[Image:Sri Aurobindo sign.jpg|rahmenlos|190 px|right]]
श्री अरविंद हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतदर्शी व युगप्रवर्तक तत्वज्ञ आणि महायोगी होत. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ञ,
यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता होते. इंग्लंडमधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला. त्यांना इंग्लिश शिक्षण, त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलाना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. भारतीय धर्म, संस्कृती व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना बंगाली ही त्यांची मातृभाषासुद्धा शिकू दिली नाही.
लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी श्री अरविन्दांना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्यात आले. लहान वयातच त्यांनी लाटीन, इंग्लिश, ग्रीक या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले. केम्ब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. ते 'इंडियन मजलिस' या संघटनेचे कार्यवाह बनले. ते एक जहाल देशभक्त म्हणून अल्पावधीतच ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलाने I .C .S ची परीक्षा उत्तीर्ण करावी ही वडिलांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणात नापास झाले. फेब्रुवारी १८९३ मध्ये श्री अरविंद भारतात येऊन पोहोचले.
भारतात परतल्यानंतर ते बडोदा संस्थानच्या नोकरीत रुजू झाले. बडोद्यास सयाजीराव गायकवाड यांचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. महाविद्यालयात फ्रेंच व इंग्रजीचे प्राध्यापक आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही काम केले. येथे ते बंगाली आणि संस्कृत या भाषा शिकले. तिथे असतानाच त्यांनी वेदांचा अभ्यास केला व योगसाधनेस प्रारंभ केला. तेथे त्यांनी भारतीय
==तत्त्वज्ञान==
कर्म, ज्ञान, आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित 'पूर्णयोगा'ची मांडणी त्यांनी केली. 'माणूस हा उत्क्रांतीतील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर अतिमानसाचा उदय व्हायचा आहे'; यासंबधीची तार्किक आणि तात्विक मांडणी त्यांनी 'दिव्य जीवन' या ग्रंथातून केली आहे.
==ग्रंथसंपदा==
त्यांच्या
==संदर्भ==
श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन, ले. डॉ.गजानन नारायण जोशी; पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९८२
|