"नानाजी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ६०:
प्रथम [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] [[स्वयंसेवक]] व नंतर [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशात]] पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या नानाजींनी संघाचे तत्कालीन प्रमुख ([[सरसंघचालक]]) श्री [[गोळवलकर गुरुजी]] यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. यातूनच [[जनसंघ|जनसंघाची]] स्थापना झाली. [[दीनदयाळ उपाध्याय]], [[सुंदरलाल भंडारी]], [[अटलबिहारी वाजपेयी]] व [[लालकृष्ण अडवाणी]] यांच्यासमवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. नंतर [[जनता पक्ष|जनता पक्षाच्या]] माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय सहभागी झाले. [[पांचजन्य]], [[राष्ट्रधर्म]] व [[स्वदेस]] या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. [[राम मनोहर लोहिया]], [[जयप्रकाश नारायण]], [[चरणसिंग]] या अन्य विचारधारेच्या नेत्यांशीही त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. दरम्यानच्या काळात आचार्य [[विनोबा भावे|विनोबा भावेंच्या]] [[भूदान चळवळ|भूदान चळवळीतही]] ते सहभागी झाले होते. सुमारे दोन महिने ते विनोबाजींबरोबर प्रवास करत होते. पण त्यानंतरच्या काळात मनुष्यविकास व सामाजिक विकास याबाबतच्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावाद या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक, विधायक कामांची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रीपद नाकारले. त्या काळात राजनीतीतील चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीत दबदबा होता, अनेक महत्त्वाची सत्तापदे त्यांच्याकडे सहजगत्या येत होती. पण त्यांनी तो मोह निग्रहाने नाकारून, राजकारण-संन्यास घेऊन अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला. या विचारातूनच त्यांनी [[दीनदयाळ संशोधन संस्था]] स्थापन केली.
पुढील काळात त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून सर्वप्रथम [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशामधील]] [[गोंडा]] जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले. सुमारे ४०,००० कूपनलिकांच्या माध्यामातून त्याठिकाणच्या
या सर्व कार्याला धर्माचे अधिष्ठान असावे या हेतूने व आपल्या सर्वांच्या जीवनात काय आदर्श असावेत हे सूचित करण्यासाठीच चित्रकूटमध्ये अभूतपूर्व असे श्रीरामदर्शन हे कायमस्वरूपी प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. रामायणातील घटना डोळ्यासमोर उभ्या
[[चित्रकूट]] हे त्यांचे कर्मस्थान होते. आरोग्यधाम व गोशाळा उद्यमिता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा गुरुकुल, [[ग्रंथालय]], मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र इत्यादी त्यांनी तेथे उभारली. ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यास व त्यांना स्वावलंबी बनविण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांनी सुमारे इ.स. १९९० चे दरम्यान [[मध्य प्रदेश]] व [[उत्तर प्रदेश]] या राज्यांतील प्रत्येकी सुमारे २५० गावे दत्तक घेतली व त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. शिक्षण, स्त्रियांना गृहोद्योग, स्वच्छता, शुद्ध बोलणे इत्यादी शिकविण्यास त्यांनी कार्यकर्त्यांचा एक चमू उभारून ग्रामविकासाचे काम चालवले. नानाजींच्या याच कामाचे फलित म्हणजे चित्रकूट क्षेत्रातील ८० खेड्यांमधील कोर्टामध्ये चालू असलेले जवळजवळ ६० टक्के खटले लोकांनी मागे घेतले व एकत्र बसून त्यावर निर्णय घेतले. चित्रकूटबरोबरच भारतातील इतर राज्यांमधील सर्वात मागास जिल्हे निवडून त्या ठिकाणी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून काम सुरू आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील होमरी येथे प्रकल्प कार्यरत आहे. सोनदरा गुरुकुल, कृषिविकास, आरोग्य शिक्षण, योगाभ्यास, कलांचे शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण या प्रकल्पांच्या माध्यमातून येथे कार्य चालते.
ते आजीवन ब्रह्मचारी होते.
|