"अरविंद घोष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
No edit summary
ओळ ४:
श्री अरविंद हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतदर्शी व युगप्रवर्तक तत्वज्ञ आणि महायोगी होत.
यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता होते. इंग्लंडमधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला. त्यांना इंग्लिश शिक्षण, त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलाना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. भारतीय धर्म, संस्कृती व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना बंगाली ही त्यांची मातृभाषासुद्धा शिकू दिली नाही.
लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी श्री अरविन्दांना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्यात आले. लहान वयातच त्यांनी लाटीन, इंग्लिश, ग्रीक या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले. केम्ब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. ते 'इंडियन मजलिस' या संघटनेचे कार्यवाह बनले. ते एक जहाल देशभक्त म्हणून अल्पावधीतच ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलाने I .C .S ची परीक्षा उत्तीर्ण करावी ही वडिलांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणात नापास झाले. फेब्रुवारी १८९३ मध्ये श्री अरविंद भारतात येऊन पोहोचले.
 
भारतात परतल्यानंतर ते बडोदा संस्थानच्या नोकरीत रुजू झाले. बडोद्यास सयाजीराव गायकवाड यांचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. महाविद्यालयात फ्रेंच व इंग्रजीचे प्राध्यापक आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही काम केले. येथे ते बंगाली आणि संस्कृत या भाषा शिकले. तिथे असतानाच त्यांनी वेदांचा अभ्यास केला व योगसाधनेस प्रारंभ केला. तेथे त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचे वाचन केले. विष्णू भास्कर लेले या महाराष्ट्रीयन योग्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाचे प्राथमिक धडे गिरविले.योगमार्गातील त्यांची प्रगती पाहून स्वतः लेलेदेखील स्तिमित झाले. याच काळात ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. ते लोकमान्य टिळकांचे सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रीय सहभागी झाले. त्यांनी मुंबईच्या 'इंदुप्रकाश' या वर्तमानपत्रात लेख लिहून आपली राजकीय मते मांडली. बंगालच्या १९०६मध्ये झालेल्या फाळणीनंतर ते हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे प्राचार्य झाले. त्याच वर्षी त्यांनी वंदे मातरम् हे वृत्तपत्र सुरू केले.
लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची छाप होती. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणात नापास झाले.
 
पुढे ते केंब्रिजला गेले. तिथे त्यांना इंडियन मजलिस ह्या भारतीयांच्या संघटनेची स्थापना केली. भारतात १८९३मध्ये परतल्यावर ते बडोद्याच्या एका कॉलेजात प्रेंच व इंग्रजी शिकवू लागले. तिथे असतानाच त्यांनी वेदांचा अभ्यास केला व योगसाधनेस प्रारंभ केला.
 
त्यांनी मुंबईच्या इंदुप्रकाश या वर्तमानपत्रात लेख लिहून आपली राजकीय मते मांडली. बंगालच्या १९०६मध्ये झालेल्या फाळणीनंतर ते हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे प्राचार्य झाले. त्याच वर्षी त्यांनी वंदे मातरम् हे वृत्तपत्र सुरू केले.
 
बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना त्यांना १९०७मध्ये एका वर्षाची कैद झाली.