कोल्हापूर जिल्ह्यातील जुने पारगाव व मनपाडळे ही गावे आदिलशाहीच्या अंमलाखाली होती. तेथून जवळच असलेल्या पन्हाळा किल्ल्याचे महत्त्वव लक्षात घेता समर्थांनी या दोन गावात आपला संप्रदाय वाढवला आणि परिणाम स्वरूप ह्या दोन गावात मारुतीची स्थापना केली . याच ठिकाणावरून स्वराज्याचे हेरगिरीचे काम समर्थांनी उभारले व ते स्वराज्य निर्मितीसाठी पुढे उपयुक्त ठरले.