पत्रावळ ही पळसाची पाने टाचून बनवतात.मधोमध एक पळसाचे मोठे पान ठेवून त्याभोवताली पळसाची पाने ठेवत जाऊन व त्यास बांबूच्या अतिशय पातळ शिळकांनी टाचत जाऊन साधारण गोलाकार असा आकार करण्यात येतो. पत्रावळीचा भोजन वाढण्यास करतात. लग्न प्रसंगी तसेच अनेक लोक जेवायला बसतांना याचा उपयोग होतो. नैसर्गिक साधनांपासून बनवलेली असल्याने यामुळे प्रदूषणसुद्धा होत नाही. याच प्रकारे द्रोण पण करतात. महाराष्ट्रात याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. केळीचे पानही भोजनासाठी वापरले जाते.