दीनमित्र हे भारताच्या अहमदनगर शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र होते.

दीनमित्र
प्रकारदैनिक
आकारमान७४९ बाय ५९७ सेंटिमीटर

मुख्य संपादकरावसाहेब मुकुंदराव गणपतराव पाटील
स्थापना१८८४
भाषामराठी
मुख्यालयभारत अहमदनगर, महाराष्ट्र, भारत
खप१००० हजार

इतिहास संपादन

दीनमित्र हे सर्वस्वी निराळ्या पठडीतले, केसरी परंपरेच्या व विचारांच्या विरोधी असे वृत्तपत्र होते. या पत्राचे आणखी एक वेगळेपण असे की ते पत्र अक्षरशः एक हाती चालवण्यात येत असे. हे पत्र खऱ्या अर्थाने ग्रामीण होते. १८८४ साली दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. या सार्वजनिक सभेचे मुखपत्र म्हणून दीनमित्र मासिक सुरू झाले. हे मासिकर भालेकरांचे भाचे गणपतराव पाटील चालवत असत. दीनमित्र चालविण्यात भालेकरांचा हात पाठीवर असला तरी गणपतराव पाटील हेही चांगले लेखक व कवी होते. शेतकरी वर्गात गणपतराव मराठी लिहिण्यात बाका तसाच भाषण करण्यातही बाका होता, असे त्यांच्याविषयी म्हटले जाई.[१]

दीनमित्र वृत्तपत्र जवळ जवळ १९४० पर्यंत चालले. सुमारे ३० वर्षांच्या आयुष्यात आर्थिकदृष्ट्या मात्र ते कधीच परवडले नाही. १९३८पर्यंतच्या पत्राच्या संसाराविषयी स्वतः मुकुंदरावांनी ज्युबिली अंकात आपला अनुभव नमूद केला होता - वर्तमानपत्र आणि तेही खेड्यात चालविणे अतिशय त्रासाचे काम आहे ! धंद्याच्या दृष्टीने पाहता वर्तमानपत्र हे शहरात देखील फायदेशीर होणे कठीण, मग खेड्यात ते नुकसानीचे ठरले तर त्यात नवल कसले? पण केवळ वडलांची इच्छा आणि एक प्रकारचे वेड त्यामुळे गेली २७ वर्ष पत्र चालविता आले.
'घर भाडे नाही, संपादकास पगार नाही, अशा प्रकारे केवळ पत्राचा खर्च भागवण्यासाठी गेल्या २७ वर्षात १७००० रुपये झीज सोसावी लागली! आणि यामुळे पत्रात कसल्याही प्रकारची वाढ करता आली नाही. यापुढे झीज कितपत सोसली जाईल याची शंका आहे.' [२]

पहिला अंक संपादन

प्रथम सोमठाणे येथून, व नंतर अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी या लहानशा खेड्यातून संपादक मुकुंदराव पाटील यांनी सुमारे ३० वर्ष हे पत्र मोठ्या ईर्षेने चालवले व आपले निराळेपण सातत्याने राखले.

पहिले संपादक मंडळ संपादन

दीनमित्र पत्राची मूळ कल्पना आद्य दिनबंधुकार कृष्णराव भालेकर यांची होती. भालेकरांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी १८८४ साली दीनमित्र नावाचे मासिक सुरू केले. पुढे काही दिवस साप्ताहिक म्हणूनही ते चालविले. पण ते न जमल्यामुळे पुन्हा मासिकात त्याचे रूपांतर करण्यात आले. ८ ऑक्टोबर १८९२ रोजी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी गणपतरावांचे निधन झाले व मासिक बंद पडले. पाटील यांचे निधन झाल्यावर भालेकरांनी आपल्या मुलाला पाटलांच्या विधवेच्या मांडीवर दत्तक दिले. हा मुलगा म्हणजेच दीनमित्रकार मुकुंदराव गणपतराव पाटील हे होत.

दीनमित्र पुन्हा चालू करण्याचा विचार भालेकर यांच्या मनात मरेपर्यंत, १९१०पर्यंत, घोळत होता व त्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न होता.[३]

रचना संपादन

दीनमित्राच्या प्रत्येक अंकात लेखाशी संबंधित असे चित्रही देण्यात येत असे. अनेक कररूपी जळवा लागल्या आहेत असा शेतकरी, शेतकऱ्याच्या घरात कर्जाचे उंटाचे पिल्लू शिरले आणि त्याने मग शेतकऱ्यांचे घर पाडले असे शेतकरी कुटुंब, शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ग्रामअधिकारी आणि त्यांच्या मानेवर सरकारी अधिकारी वगैरे चित्रे या मासिकात प्रसिद्ध झाली होती.[३]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ दीनमित्र सिल्व्हर ज्युबिली अंक. अहमदनगर: दीनमित्र. २६ जानेवारी १९३८.
  3. ^ a b पवार, डॉ. सुधाकर (तृतीयावृत्ती २०१२). पत्रकारितेची मूलतत्त्वे. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, प्रकाशन क्रमांक १३४०. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे संपादन