तुकडोजी महाराज साहित्य संमेलन

७वे तुकडोजी महाराज साहित्य संमेलन २ फेब्रुवारी २०१५ रोजी पुण्यात झाले. डॉ. एस.एन. पठाण संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन तुकडोजी महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकार आणि अमरावतीच्या गुरुदेव सेवा मंडळाने आयोजित केले होते.

६वे तुकडोजी महाराज साहित्य संमेलन २१ डिसेंबर २०१४ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी या गावात झाले. नेरीचे गुरुदेव सेवा मंडळ व भारतीय विचार मंच यांनी मिळून हे संंमेलन भरवले होते. रूपराव वाघ हे संमेलनाध्यक्ष होते.

५वे तुकडोजी महाराज साहित्य संमेलन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वरूड मित्रपरिवार यांच्यातर्फे नागपूर येथे ९-२-२०१३ रोजी झाले. उल्हास पवार हे संमेलनाध्यक्ष होते.

४थे तुकडोजी महाराज साहित्य संमेलन नागपूर विद्यापीठ व नागपुरातीलच सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज यांच्यातर्फे २५ एप्रिल २०१०ला नागपूरला झाले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. ल. रा. नसिराबादकर हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.

३रे तुकडोजी महाराज साहित्य संमेलन नागपूर विद्यापीठ आणि मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर विभागीय केंदातर्फे मुंबईत २७ सप्टेंबर २००८ला झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक कामत होते.

आणखी एक ३रे संमेलन : यवतमाळच्या श्रीगुरुदेव सेवा मंडळ व भारतीय विचार मंचातर्फे ३रे विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन ८ जानेवारी २०१७ रोजी यवतमाळमधील डॉ. नंदूरकर विद्यालयातल्या साईरंजन सभागृहात झाले. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख होते.

२रे तुकडोजी महाराज साहित्य संमेलन ------- येथे झाले. संमेलनाचे अधक्ष प्रा. रा. ग. जाधव होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन संपादन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समिती व गुरुदेव सेवा मंडळ, राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन १९-२० जानेवारी २०१३ या काळात राळेगांव (भंडारा जिल्हा) येथे झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे होते.

यापूर्वीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन (बारावे) मध्यप्रदेशातील सौंसर, (जिल्हा छिंदवाडा) येथे तारीख २४ एप्रिल २०११ रोजी झाले या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे होते. ११वे संमेलन २९ जानेवारी २०११ला सावळी येथे झाले होते. अध्यक्षस्थानी ’बिराड’कार अशोक पवार होते.

हे संमेलन आणि तुकडोजी महाराज साहित्य संमेलन, तसेच राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन ही वेगळी असावीत.


पहा : साहित्य संमेलने